शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम नव्हे तर जनतेमुळेच "आप"ला पराभव - कुमार विश्वास

By admin | Updated: April 28, 2017 15:41 IST

दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणा-या आम आदमी पार्टीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 28 - दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणा-या आम आदमी पार्टीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. शिवाय पक्षनेतृत्वाविरोधातही उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. आता आम आदमी पार्टीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले कुमार विश्वास यांनीही अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. 
आम आदमी पार्टीविरोधी भूमिका घेत विश्वास यांनी म्हटले आहे की, "दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएमने नाही तर जनतेनं "आप"ला हरवले आहे." 
 
शिवाय केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लोबाल करायला नको होते, असेही विश्वास म्हणाले आहेत. एक वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वास यांनी सांगितले की, पार्टीमध्ये व्यापक बदल करण्यासाठी प्रयत्न करणं गरजे आहे. ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला नाही. तर आम्हाला जनतेचं समर्थन नाही मिळाले. आम्ही आपल्या कार्यकर्त्यांसोबत व्यवस्थित संवाद  साधू शकलो नाहीत". 
 
विश्वास यांनी पार्टीचे निर्णय बंद खोलीत घेतल्याचा आरोप करत सांगितले की, अनेक निर्णय बंद खोलीत झाले.  दिल्ली मनपा निवडणुकीत अयोग्य उमेदवारांना तिकीट देण्यात आले. ईव्हीएममध्ये गोंधळ असणं हा निवडणुकीचा भाग आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. निवडणूक आयोग, कोर्ट आहे जेथे आपण आपले म्हणणे मांडू शकतो. 
 
पुढे ते असेही म्हणाले की, " जंतरमंतरवर ईव्हीएमविरोधात आंदोलन करायचे आहे की भ्रष्टाचार, मोदी आणि काँग्रेसविरोधात लढण्यासाठी आंदोलन करायचे आहे, यातील कोणत्या गोष्टी प्राधान्य द्यायचे आहे हे आम्हाला ठरवावं लागेल."
 
पंजाब, दिल्लीत "आप"चा पराभव झाला आहे. यावर पार्टीला बसून निर्णयाक भूमिका घ्यावी लागेल, असेही विश्वास म्हणालेत.  गोपाल राय यांना दिल्ली आपचे संयोजक पद देण्याबाबत  उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, "गोपाल राय सक्षम व्यक्ती आहेत. पार्टीतून बहुमत मिळाल्याने त्यांना हे पद सोपवण्यात आले. या पदासाठी केवळ राय हेच एकमेव उमेदवार होते अशातला भाग नाही. मात्र बहुमत मिळाल्यानं मीदेखील त्यांच्या नावावर सहमती दर्शवली"
 
दुसरीकडे,"दिल्लीत जे "आप"नं काम केले ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. आम्हाला सुधारणा करणं गरजेचं आहे."
उल्लेखनीय बाब म्हणजे आम आदमी पार्टीच्या कार्यप्रणालीबाबत काही दिवसांपूर्वी विश्वास यांनी एक व्हिडीओ जारी करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकप्रकारे सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता. 
 
दरम्यान, हे प्रकरण आणखी चिघळू नये यासाठी केजरीवाल यांनी व्हिडीओची प्रशंसा करत पार्टीतील अन्य आमदारांनाही पाहण्यास सांगितले. यानंतर पार्टीतील अनेकांकडून केजरीवाल यांना सल्ले देण्यात आले.