शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

"उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय काही काम नाही..."; तामिळनाडूत नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 17:50 IST

Durai Murugan Statement on North Indian:आमच्याकडे एक पुरुष एका महिलेशी लग्न करू शकतो परंतु उत्तर भारतात तसं नाही. त्यांची संस्कृती वेगळी आहे असं त्यांनी सांगितले. 

वेल्लोर - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि सीमांकनाच्या मुद्द्यावरून भाजपाशासित केंद्र सरकार आणि तामिळनाडू यांच्यातील संघर्ष आणखी वाढला आहे. त्यातच तामिळनाडू सरकारमधील जलसंपदा मंत्री दुरईमुरुगन यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण झाला आहे. उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय काही काम नाही असं विधान करत दुरईमुरूगन यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरून खोचक भाष्य केले आहे.

मंत्री दुरईमुरुगन म्हणाले की, दक्षिणेतील संस्कृती उत्तर भारताच्या संस्कृतीपेक्षा चांगली आहे. तामिळ प्रथा परंपराविरुद्ध उत्तर भारतात बहुविवाहसारख्या प्रथेचं समर्थन करतात. उत्तर भारतीय संस्कृती एका महिलेला ५ अथवा १० पुरुषांशी लग्न करण्याची परवानगी देते, परंतु तामिळ संस्कृतीत असं नाही. महाभारतातील द्रौपदीने पाच पांडवांशी विवाह केल्याचा हवाला त्यांनी दिला. आमच्याकडे एक पुरुष एका महिलेशी लग्न करू शकतो परंतु उत्तर भारतात तसं नाही. त्यांची संस्कृती वेगळी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच केंद्र सरकारने आम्हाला लोकसंख्या नियंत्रणाबाबत सांगितले ते आम्ही ऐकलं त्यामुळे आपली लोकसंख्या कमी झाली परंतु उत्तर भारतात लोकसंख्या कमी झाली नाही. त्याठिकाणी १७,१८ मुले जन्माला आली. उत्तर भारतात तसा कुठला नियम पाळला जात नाही. उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याशिवाय दुसरं काही काम नाही असं वक्तव्य मंत्री दुरईमुरूगन यांनी कार्यक्रमात केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या विधानाविरोधात निषेध करण्यासाठी गुडियाट्टम येथे कार्यक्रम होता. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, आपण संधी गमावली आहे. तामिळनाडूसारख्या दाक्षिणात्य राज्यांनी १९७१ पासून केंद्र सरकारच्या कुटुंब नियोजन अभियानाला साथ देत यशस्वीपणे ते राबवले. आता लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघाचे सीमांकन झाले तर संसदेत कमी प्रतिनिधित्व मिळून ती आम्हाला शिक्षा असेल. अनेक दक्षिणेतील राज्यांचे संसदेत प्रतिनिधित्व कमी होईल आणि उत्तर भारतातील प्रतिनिधित्व वाढेल. लोकसंख्येच्या आधारे राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या जागा ठरतील. त्यामुळे सीमांकनाला तामिळनाडू सरकारचा विरोध असल्याचं मंत्री दुरईमुरूगन यांनी म्हटलं.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCentral Governmentकेंद्र सरकारhindiहिंदी