शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

काश्मीरसह उत्तर भारत गोठलेलाच; अनेक भागात जाेरदार बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी, देशात इतरत्र दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:43 IST

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही जाेरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक आनंदी झाले आहेत. तर, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे.

श्रीनगर/नवी दिल्ली : उत्तर भारतात सुरू असलेल्या थंडीचा कडाका रविवारी थाेडा कमी झाला असला तरी जम्मू-काश्मीरमध्ये मात्र अनेक भागांत तापमान शून्य अंशाच्या खाली असल्याने सामान्य जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, राजस्थानात काही भागांत हलका पाऊस होत असून अनेक भागांत दाट धुक्याचे साम्राज्य आहे.

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही जाेरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक आनंदी झाले आहेत. तर, राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात थंडीचा कडाका थोडा कमी झाला आहे. राजस्थानातील अनेक भागांत धुक्यामुळे दृष्यमानता ५० मीटर इतकी नोंदवली गेली. या धुक्यामुळे महामार्गांवर वाहतूक संथ सुरू होती. येत्या दोन दिवसांत राज्याच्या अनेक भागांत तापमान आणखी कमी होण्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे.

श्रीनगरमध्ये विमान सेवा, महामार्ग पुन्हा सुरू - श्रीनगरमध्ये हाेत असलेल्या हिमवृष्टीमुळे दोन दिवसांपासून बंद असलेली विमानसेवा रविवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या येथील हवामान पाहता ही सेवा सुरळीतपणे सुरू राहील, अशी अपेक्षा विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.- दरम्यान, काश्मीर खोऱ्याला देशाच्या इतर भागांशी जोडणारा श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग एक दिवस बंद ठेवल्यानंतर रविवारी वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

‘चिल्ला-ए-कलां’च्या काळात वाढली थंडीकाश्मीर खोऱ्यात २१ डिसेंबर ते ३१ जानेवारी हा काळ ‘चिल्ला-ए-कलां’म्हणून ओळखला जातो. या काळात कडाक्याची थंडी असते. यानंतर २० दिवस ‘चिल्ला-ए-खुर्द’ आणि १० दिवस ‘चिल्ला-ए-बच्चा’ काळात कडाका कमी झाला तरी थंडीची लाट कायम राहणार आहे.

गुलमर्गमध्ये पारा शून्याच्या खाली ८ अंशावरकाश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ८ अंश नोंदवले गेले, तर अमरनाथ यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या पहलगाममध्ये तर तापमान उणे ८.५ अंशावर गेले आहे. श्रीनगरमध्ये रात्रीचे तापमान उणे ०.२ अंश होते.