शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

'सधन घरातील विद्यार्थ्यांनी वाढीव शुल्क भरावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 01:51 IST

‘सुपर ३०’चे आनंद कुमार यांचे प्रतिपादन

नागपूर : ‘जेएनयू’मधील (जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलताना, काळानुरुप शुल्कवाढ करणे अयोग्य नाही. मात्र गरीब विद्यार्थ्यांना यातून निश्चितच सवलत मिळायला हवी. सधन घरांमधील विद्यार्थ्यांनी हे वाढीव शुल्क भरण्यास तर काहीच हरकत नाही, असे मत ‘सुपर-३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केले.‘जेएनयू’मध्ये विद्यार्थी राजकारण असणे वाईट नाही, परंतु त्याची पद्धत योग्य हवी. तसेच ‘जेएनयू’मधील वाद शमविण्यासाठी सरकार, विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थ्यांनी एकत्रित बसायला हवे, असे देखील ते म्हणाले.सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेसाठी ते नागपुरात आले होते. यावेळी ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. विद्यापीठांमधील राजकारणाचे ध्येय हे सकारात्मक असले पाहिजे. तेथे वास्तविक राजकारण होता कामा नये. गरजू व योग्य विद्यार्थ्यांपर्यंत सुलभ शिक्षण कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न व्हावेत. जर एखाद्या विद्यापीठात शुल्क वाढवावे लागलेच तर सरकारने गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केल्या पाहिजेत.कोचिंग क्लासेसवर लगाम लावणे शक्यच नाहीदेशभरात कोचिंग क्लासेसचे पीक फोफावले आहे. अनेक जण केवळ गल्लाभरुपणा करत आहेत. या क्लासेसवर लगाम लावणे शक्य नाही. मात्र यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने शासकीय शाळांना मजबूत करुन तेथे सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. शिक्षकांसाठीदेखील विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले पाहिजेत. कोचिंग क्लासेसला समांतर व्यवस्था शाळांतूनच उभी राहिली पाहिजे, असे मत आनंद कुमार यांनी व्यक्त केले.