शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

अनिवासी भारतीयांना मिळणार ई-मताधिकार!

By admin | Updated: January 12, 2015 00:11 IST

अनिवासी भारतीयांना अनेक सुविधा पुरविल्यानंतर आता त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़

नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना अनेक सुविधा पुरविल्यानंतर आता त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ अनिवासी भारतीयांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाचा अधिकार देण्याची एका समितीची शिफारस स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़ अनिवासींना मतदानाचा अधिकार देण्याच्या मुद्यावर सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे़ यानंतर या आठवड्यात सरकार सर्वोच्च न्यायालयासमक्ष आपली भूमिका मांडणार आहे़ निवडणूक आयोग, कायदा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संबंधित समितीने गतवर्षी सर्वोच्च न्यायालयास आपला अहवाल सोपवण्यापूर्वी सर्व वर्गांकडून त्यांची मते जाणून घेतली होती़ कोरे पोस्टल बॅलेट इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अनिवासींना पाठवले जाऊ शकतात आणि अनिवासी ते भरून टपालाद्वारे परत करू शकतात़ एक वा दोन मतदारसंघांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करता येईल़ स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीचा हेतू यातून साध्य झाला आणि ही प्रक्रिया व्यवहार्य सिद्ध झाली, तर लोकसभा निवडणुकीपर्यंत तिचा विस्तार केला जाऊ शकतो, असे समितीने सर्वोच्च न्यायालयासमक्ष दिलेल्या आपल्या अहवालात म्हटले होते़ उपनिवडणूक आयुक्त विनोद जुत्थी यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यीय समितीने हा ५० पानांचा अहवाल तयार केला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)