शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

SEBIनं सुब्रतो रॉय यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट केलं रद्द

By admin | Updated: April 21, 2017 17:46 IST

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा दिला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा दिला आहे. सुब्रतो रॉय हे नियमित सुनावणीला उपस्थित राहत असल्यानं सेबी कोर्टानं सुब्रतो रॉय यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलं आहे. रॉय यांच्यावरील आरोप निश्चित प्रकरणावरही 18 मे रोजी सुनावणी होणार आहे, असं कोर्टानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं 300 कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरल्याने सहाराच्या पुणे येथील अ‍ॅम्बी व्हॅलीतील मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. सहारा समूह गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता. त्यावेळी 17 एप्रिल 2017पर्यंत सहारा समूहानं रक्कम न भरल्यास पुण्यातील अ‍ॅम्बी व्हॅलीच्या 40,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा, असा सल्लावजा आदेशच सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाला दिला होता.मालमत्तेच्या लिलावातून गुंतवणूकदारांच्या ठेवी त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी रक्कम जमवण्यास मदत होईल, यासाठी सहारा समूहाला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीचे मूल्य 40 हजार कोटी रुपये आहे. 17 एप्रिलपर्यंत ही रक्कम भरण्यात येईल, असं सहारा समूहानं न्यायालयाला आश्वासन दिलं होतं. यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयानं सांगितले होते की, जर या प्रकरणात काही रक्कम जमा करण्यात येत असेल तर न्यायालय वेळ वाढवून देण्याबाबत विचार करेल. दरम्यान, सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी सहाराची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या आईच्या निधनानंतर 6 मे 2016 रोजी न्यायालयाने रॉय यांना चार आठवड्यांसाठी पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर पॅरोलची मुदत वाढवूनही देण्यात आली होती. तसेच 4 मार्च 2014 रोजी रॉय यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते.