शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

2019मध्ये नरेंद्र मोदींचा कोणीच करू शकणार नाही मुकाबला- नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 18:44 IST

बिहारमध्ये भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता नितीश कुमार हे भाजपाच्या बाजूनं बोलू लागले आहेत.

ठळक मुद्दे2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही, असं नितीश कुमार म्हणाले आहेतनरेंद्र मोदींशी सामना करण्याची क्षमता कोणातच नाही, 2019मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील.भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी कोणाशीही तडजोड करू शकत नाही. तेजस्वी यादवला फक्त सीबीआय छाप्यांवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं होतं.

पाटणा, दि. 31 - बिहारमध्ये भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता नितीश कुमार हे भाजपाच्या बाजूनं बोलू लागले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही, असं नितीश कुमार म्हणाले आहेत. बिहारमध्ये एनडीएसोबत संसार थाटल्यानंतर नितीश कुमारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींशिवाय देशाला पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. नरेंद्र मोदींशी सामना करण्याची क्षमता कोणातच नाही, 2019मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील. 2019मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नितीश कुमारांनी हे उत्तर दिलं आहे.ते म्हणाले, 2019मध्ये दिल्लीची सत्ता कोणी दुसरं काबिज करू शकत नाही. यावेळी नितीश कुमारांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मी कोणाशीही तडजोड करू शकत नाही. तेजस्वी यादवला फक्त सीबीआय छाप्यांवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं होतं. मात्र ते त्यासाठी तयार नव्हते. कारण त्यांच्याजवळ बोलण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे मला महागठबंधन ठेवणं कठीण झालं होतं. नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीका केली आहे. काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पैसा कमावता आहेत. हे मी कसं सहन करू शकतो. माझ्याजवळ दोनच मार्ग होते, एक तर भ्रष्टाचाराशी तडजोड करावी अन्यथा लोकांच्या टीकेचं धनी व्हावं. मी कोणत्याही टीकेला घाबरत नाही. त्यांच्यासाठी धर्मनिरपेक्षता म्हणजे चादर ओढून पैसा कमावणं आहे. नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकला समर्थन दिल्यानंतरही माझ्यावर अनेकांनी टीका केली. मात्र मी सुरुवातीपासूनच यासोबत होतो.80 टक्के लोकांकडे 1000 ते 500च्या जुन्या नोटा होत्या. बेनामी संपत्तीवर कडक कारवाई करण्याच्या बाजूनं मी होतो. जर आता कोणाच्या बेनामी संपत्तीवर छापा पडत असल्यास मी त्याचं समर्थन करू शकत नाही. आरजेडीसोबत सरकारमध्ये असताना मी खूप आरोप सहन केले. मात्र आघाडीमध्ये अशा गोष्टी होत असतात, असं धरून मी चाललो. माझ्या पक्षाकडून राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर कोणीही टीका केली नव्हती. मात्र राष्ट्रीय जनता दलानं ब-याचदा आमच्यावर वादग्रस्त टीका केली. राष्ट्रीय जनता दलानं सरकारच्या कामातही हस्तक्षेप केला होता. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात अभियान चालवलं होतं. तरीही तेजस्वी यादवला आम्ही एक संधी दिली होती. मात्र त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचं स्पष्टीकरण दिलं नाही. ते स्पष्टीकरण त्यांना जनतेसमोर द्यायचं होतं. तेजस्वी यांनी तसं केलं असतं तर महागठबंधन कायम राहिलं असतं.