शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

पंतप्रधान मोदींना नोबेल पुरस्कार द्या, BSE च्या सीईओंनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 08:26 IST

BSE चे सीईओ आशिष चौहान यांनी गेल्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम आणि सरकारच्या प्रयत्नांनी तुलना केली.

नोबेल पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नावाचा विचार व्हायला हवा, असे मुंबई शेअर बाजाराचे (BSE) सीईओ आशिष चौहान यांनी सांगितलं. यासाठी चौहान यांनी कोरोना महासाथीच्या काळात सरकारनं केलेल्या कामांची माहितीही दिली. त्याचबरोबर एक भारतीय नागरिक म्हणून देशातील गरिबांना मिळालेल्या मानवतावादी मदतीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, असंही ते म्हणाले.

"कोरोना महासाथीच्या काळात ८० कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्याच्या मर्यादेत आम्हाला सर्व सुविधा दिल्याबद्दल सरकारचे आभारी आहोत. आपण किंवा जगानं याचा स्वीकार केला नसला, तरी हे एक अतुलनीय काम आहे," असं चौहान म्हणाले. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या फुड प्रोग्राम आणि सरकारच्या प्रयत्नांची तुलना केली. शुक्रवारी एका दीक्षांत समारंभात बोलताना ते म्हणाले की, "सुमारे ८० कोटी लोकांना लाभ देणारी मोफत रेशन योजना ही गेल्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळविलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक फूड प्रोग्रामनं केलेल्या कामापेक्षा खुप मोटी आहे."

“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोफत रेशन योजनेने भारतातील गरीब नागरिकांना अराजकता आणि दुःखापासून वाचवलं आहे. ते आपण चीनसह अन्य देशांमध्ये आपण पाहिलं आहे. संपूर्ण युरोप किंवा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा किंवा संपूर्ण दक्षिण अमेरिकन देशांपेक्षा दोन वर्षांहून अधिक काळ मोफत अन्नधान्य देण्यात आलेल्या लोकांची संख्या जास्त होती," असंही त्यांनी सांगितलं.

UN नं ११.५५ कोटी लोकांना धान्य दिलं"जर आपण तुलना केली तर २०२० मध्ये नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या युएनच्या कार्यक्रमाकडे पाहिलं तर भारताच्या ८० कोटींच्या तुललनेत ११.५५ कोटी लोकांना आंशिक मदत पुरवली. ही भारतानं केलेल्या मदतीच्या केवळ १४ टक्के आहे. याचाच अर्थ नोबेल पीस प्राईज कमिटी नोबेल पीस प्राईज देण्यासाठी पंतप्रधआन नरेंद्र मोदी आणि भारत सरकारची कामगिरी पाहिल का? हे पाहावं लागणार आहे," असंही चौहान म्हणाले. यावेळी त्यांनी लसीकरण मोहिमेचंही कौतुक केलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNobel Prizeनोबेल पुरस्कारcorona virusकोरोना वायरस बातम्या