शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

एजेएसयूमुळेच झाले नाही जागा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:45 IST

भाजप म्हणतो आमच्या यशाला ते धक्का लावू शकत नाहीत

जमशेदपूर (झारखंड) : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होऊ न शकल्याचा ठपका भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष आॅल झारखंड स्टुडंटस् युनियनवर (एजेएसयू) सोमवारी ठेवला. राज्यात विधानसभा निवडणुकीत एजेएसयू दोन ते तीन जागांचा अपवाद वगळता भाजपच्या यशाला काही धक्का लावू शकत नाही, असा दावा झारखंड भाजपचे अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी केला.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एजेएसयूला आठ जागा दिल्या होत्या व यावेळी १३ ते १४ जागा देण्याची भाजपची तयारी होती. परंतु एजेएसयूचे अध्यक्ष सुदेश महातो हे १८ ते २२ जागाच मिळाल्या पाहिजेत, असे अडून बसले होते, असे गिलुआ म्हणाले. महातो यांनी मात्र आमच्या पक्षाने भाजपकडे १७ उमेदवारांची यादी विचारार्थ पाठविली होती, असे म्हटले.भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याला तसाच मान मिळाला पाहिजे व त्यांनी (एजेएसयू) त्या प्रमाणात जागा वाटप मान्य केले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी एजेएसयू हा प्रादेशिक पक्ष असल्याचा उल्लेख केला. राज्यात ८१ सदस्यांच्या विधानसभेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने ७३ उमेदवारांची तर एजेएसयूने २७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे १९ मतदारसंघांत रालोआतील भाजप व एजेएसयू हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतील. असे असले तरी भाजप किंवा एजेएसयूपैकी एकानेही आम्ही अधिकृतरीत्या वेगळे झालेलो आहोत, असे जाहीर केलेले नाही. याचा अर्थ निवडणुकीनंतर आघाडी करण्यास त्यांनी जागा ठेवली आहे.१५ नोव्हेंबर, २००० रोजी बिहारमधून झारखंड राज्य वेगळे केले गेले तेव्हापासून भाजप आणि एजेएसयू मित्र आहेत. तेव्हा महातो हे गृह मंत्रालयासह उपमुख्यमंत्रीपदावर होते. महातो यांचा २०१४ मध्ये सिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आणि त्याच मतदारसंघात झालेली पोटनिवडणूकही ते जिंकू शकले नाहीत.भाजपने तिकीट नाकारले, सरयू रॉय यांचा दावाजमशेदपूर : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरुद्ध जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राज्याचे माजी मंत्री सरयू रॉय यांनी भाजपने त्यांना तिकीट नाकारण्यांच्या कारणांपैकी एक माझी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी असलेली जवळीक असावी, असे दिले आहे.उमेदवारांची यादी अंतिम केलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या किमान तीन सदस्यांनी मला सांगितले की, नितीशकुमार यांच्या हस्ते २०१७ मध्ये माझ्या पुस्तकाच्या झालेल्या प्रकाशनामुळे मला पक्षाने तिकीट नाकारले असण्याची दाट शक्यता आहे, असे रॉय यांनी सांगितले.रॉय म्हणाले, नितीश कुमार हे जुलै २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परत आले व त्यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन केले. त्यामुळे मला तिकीट का नाकारले हे समजत नाही. रॉय यांनी जो काही दावा केला त्याबद्दल भाजपकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.