शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

एजेएसयूमुळेच झाले नाही जागा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:45 IST

भाजप म्हणतो आमच्या यशाला ते धक्का लावू शकत नाहीत

जमशेदपूर (झारखंड) : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होऊ न शकल्याचा ठपका भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष आॅल झारखंड स्टुडंटस् युनियनवर (एजेएसयू) सोमवारी ठेवला. राज्यात विधानसभा निवडणुकीत एजेएसयू दोन ते तीन जागांचा अपवाद वगळता भाजपच्या यशाला काही धक्का लावू शकत नाही, असा दावा झारखंड भाजपचे अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी केला.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एजेएसयूला आठ जागा दिल्या होत्या व यावेळी १३ ते १४ जागा देण्याची भाजपची तयारी होती. परंतु एजेएसयूचे अध्यक्ष सुदेश महातो हे १८ ते २२ जागाच मिळाल्या पाहिजेत, असे अडून बसले होते, असे गिलुआ म्हणाले. महातो यांनी मात्र आमच्या पक्षाने भाजपकडे १७ उमेदवारांची यादी विचारार्थ पाठविली होती, असे म्हटले.भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याला तसाच मान मिळाला पाहिजे व त्यांनी (एजेएसयू) त्या प्रमाणात जागा वाटप मान्य केले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी एजेएसयू हा प्रादेशिक पक्ष असल्याचा उल्लेख केला. राज्यात ८१ सदस्यांच्या विधानसभेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने ७३ उमेदवारांची तर एजेएसयूने २७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे १९ मतदारसंघांत रालोआतील भाजप व एजेएसयू हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतील. असे असले तरी भाजप किंवा एजेएसयूपैकी एकानेही आम्ही अधिकृतरीत्या वेगळे झालेलो आहोत, असे जाहीर केलेले नाही. याचा अर्थ निवडणुकीनंतर आघाडी करण्यास त्यांनी जागा ठेवली आहे.१५ नोव्हेंबर, २००० रोजी बिहारमधून झारखंड राज्य वेगळे केले गेले तेव्हापासून भाजप आणि एजेएसयू मित्र आहेत. तेव्हा महातो हे गृह मंत्रालयासह उपमुख्यमंत्रीपदावर होते. महातो यांचा २०१४ मध्ये सिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आणि त्याच मतदारसंघात झालेली पोटनिवडणूकही ते जिंकू शकले नाहीत.भाजपने तिकीट नाकारले, सरयू रॉय यांचा दावाजमशेदपूर : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरुद्ध जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राज्याचे माजी मंत्री सरयू रॉय यांनी भाजपने त्यांना तिकीट नाकारण्यांच्या कारणांपैकी एक माझी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी असलेली जवळीक असावी, असे दिले आहे.उमेदवारांची यादी अंतिम केलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या किमान तीन सदस्यांनी मला सांगितले की, नितीशकुमार यांच्या हस्ते २०१७ मध्ये माझ्या पुस्तकाच्या झालेल्या प्रकाशनामुळे मला पक्षाने तिकीट नाकारले असण्याची दाट शक्यता आहे, असे रॉय यांनी सांगितले.रॉय म्हणाले, नितीश कुमार हे जुलै २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परत आले व त्यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन केले. त्यामुळे मला तिकीट का नाकारले हे समजत नाही. रॉय यांनी जो काही दावा केला त्याबद्दल भाजपकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.