शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

एजेएसयूमुळेच झाले नाही जागा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 01:45 IST

भाजप म्हणतो आमच्या यशाला ते धक्का लावू शकत नाहीत

जमशेदपूर (झारखंड) : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होऊ न शकल्याचा ठपका भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्ष आॅल झारखंड स्टुडंटस् युनियनवर (एजेएसयू) सोमवारी ठेवला. राज्यात विधानसभा निवडणुकीत एजेएसयू दोन ते तीन जागांचा अपवाद वगळता भाजपच्या यशाला काही धक्का लावू शकत नाही, असा दावा झारखंड भाजपचे अध्यक्ष लक्ष्मण गिलुआ यांनी केला.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एजेएसयूला आठ जागा दिल्या होत्या व यावेळी १३ ते १४ जागा देण्याची भाजपची तयारी होती. परंतु एजेएसयूचे अध्यक्ष सुदेश महातो हे १८ ते २२ जागाच मिळाल्या पाहिजेत, असे अडून बसले होते, असे गिलुआ म्हणाले. महातो यांनी मात्र आमच्या पक्षाने भाजपकडे १७ उमेदवारांची यादी विचारार्थ पाठविली होती, असे म्हटले.भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून, त्याला तसाच मान मिळाला पाहिजे व त्यांनी (एजेएसयू) त्या प्रमाणात जागा वाटप मान्य केले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी एजेएसयू हा प्रादेशिक पक्ष असल्याचा उल्लेख केला. राज्यात ८१ सदस्यांच्या विधानसभेसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपने ७३ उमेदवारांची तर एजेएसयूने २७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामुळे १९ मतदारसंघांत रालोआतील भाजप व एजेएसयू हे दोन पक्ष एकमेकांविरोधात लढतील. असे असले तरी भाजप किंवा एजेएसयूपैकी एकानेही आम्ही अधिकृतरीत्या वेगळे झालेलो आहोत, असे जाहीर केलेले नाही. याचा अर्थ निवडणुकीनंतर आघाडी करण्यास त्यांनी जागा ठेवली आहे.१५ नोव्हेंबर, २००० रोजी बिहारमधून झारखंड राज्य वेगळे केले गेले तेव्हापासून भाजप आणि एजेएसयू मित्र आहेत. तेव्हा महातो हे गृह मंत्रालयासह उपमुख्यमंत्रीपदावर होते. महातो यांचा २०१४ मध्ये सिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आणि त्याच मतदारसंघात झालेली पोटनिवडणूकही ते जिंकू शकले नाहीत.भाजपने तिकीट नाकारले, सरयू रॉय यांचा दावाजमशेदपूर : झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरुद्ध जमशेदपूर (पूर्व) मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेले राज्याचे माजी मंत्री सरयू रॉय यांनी भाजपने त्यांना तिकीट नाकारण्यांच्या कारणांपैकी एक माझी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी असलेली जवळीक असावी, असे दिले आहे.उमेदवारांची यादी अंतिम केलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या किमान तीन सदस्यांनी मला सांगितले की, नितीशकुमार यांच्या हस्ते २०१७ मध्ये माझ्या पुस्तकाच्या झालेल्या प्रकाशनामुळे मला पक्षाने तिकीट नाकारले असण्याची दाट शक्यता आहे, असे रॉय यांनी सांगितले.रॉय म्हणाले, नितीश कुमार हे जुलै २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत परत आले व त्यांनी बिहारमध्ये सरकार स्थापन केले. त्यामुळे मला तिकीट का नाकारले हे समजत नाही. रॉय यांनी जो काही दावा केला त्याबद्दल भाजपकडून काहीही प्रतिक्रिया दिली गेलेली नाही.