शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

यंदा कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 03:30 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ जानेवारीपासून

- हरीश गुप्तानवी दिल्ली : अभूतपूर्व अशा कोविड महामारीमुळे यावर्षी संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाची माहिती सरकारने राजकीय पक्षांच्या नेत्यांना देताना सांगितले की, गेल्या काही दिवसांत विशेषत: दिल्लीत कोरोनाचे रुग्ण अचानक वाढल्यामुळे हिवाळ्याचे महिने हे महामारीच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.सरकारने अनौपचारिकरित्या अनेक विरोधी नेत्यांना सांगितले की, यापूर्वी १९७५, १९७९ आणि १९८४ मध्ये राज्यसभेचे हिवाळी अधिवेशन काही विशिष्ट परिस्थितीमुळे घेतले गेलेले नाही. वर्ष २०२० हे जागतिक पेचप्रसंगाचे साक्षीदार बनले आहे आणि कोरोनावरील लस लवकरच अपेक्षित असल्याने सरकारने सभागृह नेत्यांशी चर्चेनंतर हिवाळी अधिवेशन घ्यायचे नाही, असा निर्णय घेतला.सरकार ठामअधिर रंजन चौधरी यांच्याशिवाय अनेक प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांनी सभापती ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना हिवाळी अधिवेशन भलेही ते छोटे का असेना परंतु, घेतले गेले पाहिजे, असा आग्रह केला होता. सरकारने विशिष्ट व्यवस्था केलेली असल्यामुळे दोन नेत्यांनी तर संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन घेतले जाऊ शकते, अशी सूचना केली आहे; परंतु सरकारने या सूचनेला स्वीकारले नाही.सरकारमधील सूत्रांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, संसद अधिवेशनाच्या नेमक्या तारखेचा निर्णय संसदेवरील मंत्रिमंडळ समिती घेईल. ते २७ जानेवारीपासून घेतले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू झाले होते. केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल.

टॅग्स :Parliamentसंसद