शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

सरकारी कर्मचाऱ्यांच्या छळाचा अधिकार कुणालाही नाही; तक्रारखोर नागरिकांना कोर्टाने खडसावले; परिपत्रक रद्द करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:55 IST

एकदा त्यांच्या तक्रारीला उत्तर दिल्यानंतर त्याच विषयावर वारंवार केलेल्या तक्रारींना उत्तर देऊ नये, असे पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

मुंबई : एकाच मुद्याविषयी वारंवार तक्रारी करून सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणे हा मूलभूत अधिकार नाही, असे खडसावत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे एक परिपत्रक रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला.

कर्तव्यचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न नाही. मात्र, वारंवार तक्रार करणाऱ्यांच्या धमक्यांमुळे आणि दबावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे, हे अपेक्षित नाही, असे न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने सुनावले. अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला गैर हेतूने लक्ष्य करून सरकारी कामात अडथळा आणण्याची कृती निषेधार्ह ठरते, असे न्यायालयाने म्हटले. खराब रस्ते आणि झाडे तोडण्यासंदर्भात चार नागरिकांनी  वारंवार अनेक तक्रारी केल्याने पालिकेने डिसेंबर २०२१ मध्ये परिपत्रक काढून संबंधित चार व्यक्तींच्या तक्रारी अस्वीकारार्ह असल्याचे जाहीर केले. त्यांच्या तक्रारी सरकारी कर्मचाऱ्यांची छळवणूक करण्यासाठी असतात. त्यामुळे त्यांची दखल घेऊ नये. एकदा त्यांच्या तक्रारीला उत्तर दिल्यानंतर त्याच विषयावर वारंवार केलेल्या तक्रारींना उत्तर देऊ नये, असे पालिकेने परिपत्रकात म्हटले आहे.

कोर्ट काय म्हणाले?

न्यायालयाने नमूद केले. “कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच विषयावर तक्रारी करण्याचा, त्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानातून वैयक्तिक तक्रार करण्याचा मूलभूत अधिकार कोणालाही नाही. आमच्या मते, अशा धमक्या कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणू शकतात, असे न्यायालयाने म्हटले.

कोर्ट काय म्हणाले?

न्यायालयाने नमूद केले. “कर्तव्य बजावणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्याच विषयावर तक्रारी करण्याचा, त्यांनी दिलेल्या उत्तरावर असमाधानातून वैयक्तिक तक्रार करण्याचा मूलभूत अधिकार कोणालाही नाही. आमच्या मते, अशा धमक्या कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या सुरळीत कामकाजात अडथळा आणू शकतात, असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :Courtन्यायालय