शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

सीमेवर गस्त घालण्यापासून भारतीय जवानांना कोणीही रोखू शकत नाही- राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 05:56 IST

लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातील सीमारेषेची स्थिती चिनी सैनिकांनी २९ आॅगस्टच्या मध्यरात्री बदलण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : जगातील कोणतीही शक्ती भारतीय सैनिकांना लडाखमध्ये देशाच्या सीमेवर गस्त घालण्यापासून रोखू शकत नाही, असा कडक इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी चीनला दिला.पूर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, त्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. त्यासंदर्भात राज्यसभेत केलेल्या निवेदनात राजनाथसिंह यांनी सांगितले की, सीमेवर चीनने सैन्याची मोठी जमवाजमव केली आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज झालाआहे.लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातील सीमारेषेची स्थिती चिनी सैनिकांनी २९ आॅगस्टच्या मध्यरात्री बदलण्याचा प्रयत्न केला. भारत व चीन हे तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करीत होते, नेमके त्याचवेळी चीनच्या लष्कराकडून भारताविरोधात कुरापती सुरू होत्या. त्यामुळे चीनची उक्ती व कृती यात असलेले अंतर सर्वांनाच दिसूनआले.पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिक व भारताच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव खूप वाढला आहे. त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह म्हणाले की, भारताच्या शूर जवानांनी आपले प्राण पणाला लावून मातृभूमीचे रक्षण केले आहे. चीनच्या कुरापती सुरू असूनही भारतीय लष्कराने संयम बाळगला होता व योग्य वेळ येताच चीनचा शौर्याने मुकाबला केला.सभागृहात जाहीर चर्चा न करण्यावर एकमतगलवानमध्ये काही ठिकाणी भारतीय जवानांना गस्त घालण्यास चीनने विरोध केला. त्याबद्दल काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के. अ‍ॅन्टोनी यांनी विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह यांनी सविस्तर उत्तर दिले. चीनबरोबरचा तणाव हा संवेदनशील विषय असून, त्यावर संसदेत चर्चा न करण्याबाबत सरकार व विरोधी पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, या तणावाबाबत राजनाथसिंह यांनी १५ सप्टेंबर रोजी लोकसभेत केलेल्या निवेदनाबाबत काही प्रश्न विचारण्यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना अनुमती दिली होती.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह