शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अण्वस्त्र युद्ध नाहीच

By admin | Updated: September 30, 2016 01:41 IST

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील काही राजकीय नेते पाकिस्तान सरकारवर दबाव आणत आहेत. प्रतिकारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्यांत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मुहम्मद असिफ यांचाही समावेश आहे. भारताचा विनाश करण्याची हीच वेळ असल्याची भाषाही त्यांनी केली आहे. आमची अण्वस्त्रे देखाव्यासाठी नाहीत, असे व्यक्तव्यही त्यांनी मागच्याच आठवड्यात एका टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले होते. तथापि, दोन्ही देशांत अण्वस्त्र युद्ध भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे.यामागचे मुख्य कारण म्हणजे बिगर अण्वस्त्र पर्यायासंदर्भातील दोन्ही देशांमधील वाद अद्याप संपलेला नाही. आत्मघाती दहशतवादी पथके पाठवून पाकिस्तान भारताशी छुपे युद्ध करीत आहे. तथापि, या दहशतवादी संघटनांशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे पाकिस्तान वारंवार सांगत आला आहे. भारताकडून चाललेली १६० मिनिटांची ही मोहीम अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करण्याइतकीच मर्यादित होती. दरम्यान, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा पार करून आपल्या क्षेत्रातील काही लोकांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पण, अणुहल्ला करण्यासाठी पाकिस्तानला डिवचण्यासारखी ही कृती नाही. पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचे टॅक्टीकल आणि स्ट्रॅटेजिक असे दोन प्रकार आहेत. टॅक्टिकलचे क्षेत्र हे १० किमीपर्यंतचेच आहे आणि यात २०० व्यक्ती मारण्याची क्षमता आहे. ०.३ किलो टन त्याचे वजन आहे. तर, स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअरचा हल्ला संपूर्ण शहराला लक्ष्य करू शकतो. १० किलो टन एवढे त्याचे वजन आहे. जगात कोणत्याच देशाने अण्वस्त्रांचा युद्धातील डावपेचाचा भाग म्हणून वापर केलेला नाही हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे.