शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अण्वस्त्र युद्ध नाहीच

By admin | Updated: September 30, 2016 01:41 IST

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील काही राजकीय नेते पाकिस्तान सरकारवर दबाव आणत आहेत. प्रतिकारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्यांत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मुहम्मद असिफ यांचाही समावेश आहे. भारताचा विनाश करण्याची हीच वेळ असल्याची भाषाही त्यांनी केली आहे. आमची अण्वस्त्रे देखाव्यासाठी नाहीत, असे व्यक्तव्यही त्यांनी मागच्याच आठवड्यात एका टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले होते. तथापि, दोन्ही देशांत अण्वस्त्र युद्ध भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे.यामागचे मुख्य कारण म्हणजे बिगर अण्वस्त्र पर्यायासंदर्भातील दोन्ही देशांमधील वाद अद्याप संपलेला नाही. आत्मघाती दहशतवादी पथके पाठवून पाकिस्तान भारताशी छुपे युद्ध करीत आहे. तथापि, या दहशतवादी संघटनांशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे पाकिस्तान वारंवार सांगत आला आहे. भारताकडून चाललेली १६० मिनिटांची ही मोहीम अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करण्याइतकीच मर्यादित होती. दरम्यान, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा पार करून आपल्या क्षेत्रातील काही लोकांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पण, अणुहल्ला करण्यासाठी पाकिस्तानला डिवचण्यासारखी ही कृती नाही. पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचे टॅक्टीकल आणि स्ट्रॅटेजिक असे दोन प्रकार आहेत. टॅक्टिकलचे क्षेत्र हे १० किमीपर्यंतचेच आहे आणि यात २०० व्यक्ती मारण्याची क्षमता आहे. ०.३ किलो टन त्याचे वजन आहे. तर, स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअरचा हल्ला संपूर्ण शहराला लक्ष्य करू शकतो. १० किलो टन एवढे त्याचे वजन आहे. जगात कोणत्याच देशाने अण्वस्त्रांचा युद्धातील डावपेचाचा भाग म्हणून वापर केलेला नाही हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे.