शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अण्वस्त्र युद्ध नाहीच

By admin | Updated: September 30, 2016 01:41 IST

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील

- हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून जोरदार हल्ला चढवत ३८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने पाकिस्ताननेही तातडीने प्रतिहल्ला करावा, यासाठी पाकिस्तानमधील काही राजकीय नेते पाकिस्तान सरकारवर दबाव आणत आहेत. प्रतिकारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेणाऱ्यांत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मुहम्मद असिफ यांचाही समावेश आहे. भारताचा विनाश करण्याची हीच वेळ असल्याची भाषाही त्यांनी केली आहे. आमची अण्वस्त्रे देखाव्यासाठी नाहीत, असे व्यक्तव्यही त्यांनी मागच्याच आठवड्यात एका टी. व्ही. चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले होते. तथापि, दोन्ही देशांत अण्वस्त्र युद्ध भडकण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळून लावली आहे.यामागचे मुख्य कारण म्हणजे बिगर अण्वस्त्र पर्यायासंदर्भातील दोन्ही देशांमधील वाद अद्याप संपलेला नाही. आत्मघाती दहशतवादी पथके पाठवून पाकिस्तान भारताशी छुपे युद्ध करीत आहे. तथापि, या दहशतवादी संघटनांशी सरकारचा काहीही संबंध नाही, असे पाकिस्तान वारंवार सांगत आला आहे. भारताकडून चाललेली १६० मिनिटांची ही मोहीम अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करण्याइतकीच मर्यादित होती. दरम्यान, भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा पार करून आपल्या क्षेत्रातील काही लोकांना मारल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पण, अणुहल्ला करण्यासाठी पाकिस्तानला डिवचण्यासारखी ही कृती नाही. पाकिस्तानकडे अण्वस्त्रांचे टॅक्टीकल आणि स्ट्रॅटेजिक असे दोन प्रकार आहेत. टॅक्टिकलचे क्षेत्र हे १० किमीपर्यंतचेच आहे आणि यात २०० व्यक्ती मारण्याची क्षमता आहे. ०.३ किलो टन त्याचे वजन आहे. तर, स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअरचा हल्ला संपूर्ण शहराला लक्ष्य करू शकतो. १० किलो टन एवढे त्याचे वजन आहे. जगात कोणत्याच देशाने अण्वस्त्रांचा युद्धातील डावपेचाचा भाग म्हणून वापर केलेला नाही हे येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे.