शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा नको, सर्वाेच्च न्यायालयाने भाषा बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:17 IST

दलित आणि आदिवासींवरील प्रत्येक तक्रारीची, गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी, असे बंधन आम्ही घातलेले नाही

नवी दिल्ली : दलित आणि आदिवासींवरील प्रत्येक तक्रारीची, गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी, असे बंधन आम्ही घातलेले नाही. तक्रार वरकरणी अगदीच थिल्लर वाटत असेल तरच आधी शहानिशा करायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. मात्र २० मार्चच्या आपल्या निकालास स्थगिती देण्यास न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला.त्या निकालाच्या फेरविचारासाठी केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारने केलेल्या याचिकांवर न्या. ए. के. गोयल व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गुरुवारी प्रामुख्याने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचा युिक्तवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवण्यात आली. हा विषय मोठ्या खंडपीठाकडे सोपवावा, असेही वेणुगोपाळ यांचे म्हणणे होते.न्यायालयाने दिलेला निकाल सपशेल चुकीचा आहे. न्यायालयाने कायदेमंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे याचिकांवर अंतिम निकाल होईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी, अशी अ‍ॅटर्नी जनरलनी मागणी केली. एवढेच नव्हे, तर निकालानंतर दलितांवरील अत्याचार वाढले आहेत, असेही ते म्हणाले. या निकालाने सामाजिक स्वास्थ्य बिघडून देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असेही त्यांचे म्हणणे होते.निकालामागची भूमिका स्पष्ट करताना न्या. गोयल म्हणाले की, तक्रारीत तथ्य नाही असे तपास अधिकाऱ्यास वरकरणी दिसत असले तरी सरसकट सर्वच तक्रारींवर आरोपींना लगेच अटक होत आहे. काही तक्रारींमध्ये दम असतो तर काही अगदीच थिल्लर असतात. त्यामुळे ज्या तक्रारी प्रथमदर्शनी तथ्यहीन वाटतील त्यांची अटकेआधी शहानिशा होणे गरजेचे आहे, असे आम्ही म्हटले आहे. प्रत्येक तक्रारीची शहानिशा केलीच पाहिजे असे बंधन घातलेले नाही. तो निर्णय तपासी अधिकाºयांवर सोडला आहे.