शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांच्या सम-विषम फॉर्म्युल्यावर नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:13 IST

'आमच्या योजनामुळे दिल्ली प्रदूषण मुक्त होईल'

नवी दिल्ली : प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर उपाय म्हणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सम-विषम फॉर्म्युला 4 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान लागू होणार आहे. या व्यतिरिक्त, प्रदूषणमुक्तीसाठी त्यांनी 7 सूत्रीय कृती कार्यक्रमाचीही घोषणा केली आहे.

यावर केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून दिल्लीत सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. नितीन गडकरी म्हणाले, "याची गरज असल्याचे मला वाटत नाही. आम्ही जो रिंग रोड तयार केला आहे, त्यामुळे शहरातील प्रदूषण मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. पुढील दोन वर्षांत आमच्या योजनामुळे दिल्ली प्रदूषण मुक्त होईल." 

दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात दिल्लीच्या आसपासच्या राज्यात गवत जाळले जाते. त्यामुळे दिल्लीत मोठ्याप्रमाणत प्रदूषण होते. या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पुन्हा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षांमध्ये नोव्हेंबर महिन्यात सम-विषम फॉर्म्युला लागू केल्यामुळे राज्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अजून प्रदूषण कमी करण्याचा दिल्ली सरकारचा प्रयत्न असणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. तसेच, एक्सपर्ट्ससोबत चर्चा केली होती. दिवाळीत फटाक्यांमुळे धूराचे प्रमाण वाढते. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना आवाहन आहे की, फटाके फोडू नका. सुप्रीम कोर्टाचाही तसा आदेश आहे. याशिवाय, प्रदूषण संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी वॉररुम सुद्धा तयार करण्यात येणार आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

कोणत्या तारखेला सम-विषम असणार?दिल्ली सरकारने तयार केलेल्या फॉर्म्युल्यानुसार सम नंबरच्या गाड्या ५, ७, ११, १३, आणि १५ तारखेला रस्त्यांवर असतील, तर विषम नंबरच्या गाड्या ४, ६, ८, १२ आणि १४ तारखेला रस्त्यांवर धावू शकणार आहेत. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीArvind Kejriwalअरविंद केजरीवालNew Delhiनवी दिल्ली