शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

दिल्लीत पुन्हा लॉकडाउनची चर्चा? आरोग्यमंत्री म्हणतात...

By मोरेश्वर येरम | Updated: November 18, 2020 13:31 IST

दिल्लीत सध्या करोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येने जोर धरला आहे. त्यात छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर गर्दी झाल्यास करोनाचा फैलावास वाव मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदिल्लीत पुन्हा लॉकडाउनची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरणदिल्लीत करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतेयछठ पूजेच्या पार्श्वभूमीवर बाजार पेठांमध्ये लॉकडाउनची मागणी

दिल्लीराजधानी दिल्लीमध्ये करोनाचा कहर काही थांबताना दिसत नाहीय. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच दिल्लीतील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूंचं प्रमाण पाहता राजधानीत पुन्हा एकदा लॉकडाउनच्या चर्चेने जोर धरला आहे. पण दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंत जैन यांनी लॉकडाउनचे वृत्त फेटाळून लावले आहे. 

'पुन्हा लॉकडाउन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. फक्त हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी काही निर्बंध लादले जाऊ शकतात. सध्या दिल्लीत जास्तीत जास्त कोविड चाचण्या केल्या जात आहेत. त्यात आणखी वाढ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे', असं सत्येंद्र जैन म्हणाले. 

दिल्लीत सध्या करोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येने जोर धरला आहे. त्यात छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर गर्दी झाल्यास करोनाचा फैलावास वाव मिळण्याची शक्यता आहे. 'छठ पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातून सहज व्हायरस पसरला जातो. त्यामुळे काही निर्बंध घालणे आवश्यक आहे', असंही जैन म्हणाले. 

केजरीवालांनी केंद्राकडे केली लॉकडाउनची मागणीदिल्लीतील करोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे बाजार क्षेत्रात लॉकडाउन करण्याची मागणी केली होती. 'करोनाचा हॉटस्पॉट ठरू शकतात अशा बाजार क्षेत्रात लॉकडाउनची मागणी करण्यासाठीशी शिफारस केंद्राकडे केली आहे', असं केजरीवाल यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण दिल्लीत लॉकडाउन होणार अशा चर्चेने जोर धरला होता. अखेर बुधवारी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीत अजिबात लॉकडाउन केलं जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. 

एनसीआर भागात रॅपिड टेस्टिंगदिल्लीतील वाढती रुग्णसंख्या पाहता एनसीआर भागातही सावधगिरी बाळगली जात आहे. नोएडा प्रशासनाने डीएनडी उड्डाणपूल आणि चिल्ला बॉर्डरवर नोएडाकडे जाणाऱ्या लोकांची रॅपीड टेस्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. 

दिल्लीत करोनाचा हाहा:कारदिल्लीत मंगळवारी करोनाचे ६,३९६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच दिल्लीतील एकूण रुग्णांची संख्या आता ४.९५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. तर आतापर्यंत ७,८१२ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :delhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवाल