शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

अल्पमुदतीच्या कर्जावर व्याज सबसिडी नको

By admin | Updated: April 25, 2016 04:19 IST

तीन लाख रुपयांपेक्षा अधिक अल्पकालिक कर्जावर व्याजावर सबसिडी देऊ नये, अशी सूचना कृषी क्षेत्रासाठी नऊ लाख कोटी रुपयांची कर्ज योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या सरकारी समितीने केली आहे.

नवी दिल्ली : तीन लाख रुपयांपेक्षा अधिक अल्पकालिक कर्जावर व्याजावर सबसिडी देऊ नये, अशी सूचना कृषी क्षेत्रासाठी नऊ लाख कोटी रुपयांची कर्ज योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी गठित केलेल्या सरकारी समितीने केली आहे.या कर्ज योजनेची चांगल्या रीतीने अंमलबजावणी करता यावी, यासाठी त्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी सरकारने ही समिती गठित केली आहे. विशेष म्हणजे सबसिडी केवळ एक वर्षासाठी न देता कर्ज परतफेडीच्या पूर्ण कालावधीसाठी द्यावी, अशी शिफारसही समितीने केली आहे.पीक कर्ज गरज असणारे छोटे आणि मध्यम शेतकरी यांना उपलब्ध व्हावे आणि व्याज सवलत योजनेचा चांगला उपयोग व्हावा यासाठी कृषी मंत्रालयाने व्ही.सी. सारंगी यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती गठित केली आहे. व्याज सवलत योजनेनुसार शेतकऱ्यांना सध्या एक वर्षासाठी तीन लाख रुपयांच्या अल्पकालिक कर्जावर एक वर्षासाठी सात टक्के व्याज मिळते. जे शेतकरी या अवधीत कर्जाची परतफेड करतात त्यांना कर्ज चार टक्के दराने मिळते. सरकारने यंदा अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे ‘लक्ष्य’ वाढवून ९ लाख कोटी रुपये केले आहे आणि चालू वित्तीय वर्षात सबसिडीसाठी १५ हजार कोटी रुपये वितरित केले आहेत. या समितीच्या अहवालात म्हटले आहे की, २००६-०७ मध्ये व्याज सबसिडी योजना सादर केल्यानंतर कृषी कर्ज प्रवाह वाढला आहे. या कार्यक्रमाचे ‘लक्ष्य’ गाठण्यासाठी समितीने अनेक सूचना केल्या आहेत. या अहवालाच्या आधारे कृषी मंत्रालय कॅबिनेट नोट तयार करीत आहे. सारंगी समितीने आपल्या प्रमुख शिफारशीत म्हटले आहे की, व्याज सवलतीची योजना तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालिक कर्जासाठी कायम ठेवली पाहिजे; मात्र तीन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असेल तर ही सुविधा उपलब्ध करू नये. कर्जाची रक्कम तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर सध्याच्या नियमानुसार तीन लाखांपर्यंतच्या रकमेवर व्याज सवलत मिळते. मात्र समितीने हा नियम बदलण्याची व तीन लाखांपेक्षा कर्जाची जास्त रक्कम असेल तर व्याजाची सवलत देऊ नये, असे म्हटले आहे. कृषी क्षेत्र सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे. हे ओझे कमी करण्यासाठी समितीने ठरलेल्या तारखेनंतर १२ महिन्यांनंतरही सबसिडी दिली पाहिजे.>समितीने काय म्हटले...समितीने म्हटले आहे की, ऊस आणि केळी यासारख्या पिकांचा अवधी मोठा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाच्या आत कर्ज परतफेड करणे कठीण होते. देशाच्या विविध भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी येत्या २ वर्षांपासून संकटाचा सामना करीत आहेत. उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असतानाच समितीच्या या शिफारशी आल्या आहेत.