शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ना युती, ना आघाडी! मायावतींनी वाढदिवशीच केली मोठी घोषणा; लोकसभा एकट्याने लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 12:21 IST

उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत. मायावतींनी यादवांनंतर मोदींवरही टीका केली आहे.

लखनऊ: लोकसभेला भाजप प्रणित युती विरुद्ध काँग्रेस प्रणित आघाडी असे दोन गट एकत्र येऊन लढण्याची तयारी करत आहेत. असे असताना उत्तर प्रदेशमध्ये मतदारांना तीन पर्याय मिळणार आहेत. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज वाढदिनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्य़ाची मायावतींनी घोषणा केली आहे. 

याचबरोबर मायावतींनी अखिलेश यादवांवर शाब्दिक हल्ला केला आहे. अखिलेश यादव हे सरड्यासारखे रंग बदलत असतात, त्यांच्यापासून सावध रहायला हवे. मी संन्य़ास घेणार अशी अफवा पसरविली जात आहे. मी आताच संन्यास घेणार नाहीय. अखेरच्या क्षणापर्यंत पक्षासाठी काम करत राहीन, असे मायावती यांनी म्हटले आहे. 

मायावतींनी यादवांनंतर मोदींवरही टीका केली आहे. फुकट रेशन देऊन जनतेला गुलाम बनवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मायावतींनी केला. गेल्या चार सरकारच्या काळात आम्हीच सर्व लोकांच्या कल्याणासाठी आणि सर्व लोकांच्या सुखासाठी काम केले. आमच्यानंतर आलेली सरकारे आमच्या योजनांची कॉपी करून जनतेला विसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाही जातीयवादी, भांडवलशाही आणि संकुचित मानसिकतेमुळे या योजनांचा पूर्ण लाभ लोकांना मिळत नाहीय़, असा आरोप मायावती यांनी केला. 

ना आघाडी, ना युती... मायावतींनी दिले कारणयुती केल्याने पक्षाला फायदा कमी, पण तोटाच जास्त होतो. आपली मतांची टक्केवारीही कमी होते. मात्र इतर पक्षांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे बहुतांश पक्षांना बसपासोबत युती करून निवडणूक लढवायची होती. आमचा पक्ष एकट्याने लोकसभा निवडणूक लढवून चांगले निकाल आणेल. आम्ही एकट्याने निवडणूक लढवतोय कारण त्याचे सर्वोच्च नेतृत्व दलिताच्या हातात आहे. युती केल्याने, बसपची संपूर्ण मते आघाडीच्या पक्षाला जाते, परंतु त्या आघाडीचे मत, विशेषत: सवर्णांचे मत बसपाला पडत नाही. यामुळे आम्हाला आमचा जनाधार टिकवावाच लागेल, असे मायवती म्हणाल्या. 

टॅग्स :mayawatiमायावतीlok sabhaलोकसभाBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी