शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'भूक का कोई मजहब नही होता साहंब', सहा वर्षांपासून गरिबांची भूक भागवतायंत अजहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 17:51 IST

'भूक का कोई मजहब नही होता', हेच अहजर यांच ब्रीदवाक्य आहे. भाकरीवर सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे भुकेली व्यक्ती कुठल्या जातीची, पंथाची किंवा धर्माची आहे,

हैदराबाद - सय्यद उस्मान अजहर मकसुसी यांनी माणुसकीचा धर्मच सर्वात मोठा असतो, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. हैदराबाद येथील सय्यद उस्मान हे गेल्या 6 वर्षांपासून सातत्याने गरीब, पीडित आणि वंचितांची भूक भागवतात. विशेष म्हणजे दररोज 300 ते 400 लोकांना ते मोफत जेवण देतात. शहरातील दबीरपुरा फ्लायओव्हरजवळ ते दररोज ही सेवा देताना तुम्हाला पाहायला मिळतील. 

हैदराबादच्या दबीरपुरा फ्लायओव्हरजवळील गरीब, भिकारी, बेघर, कचरा विकणारे, मजूर आणि गरजू लोक दररोज दुपारी सय्यद उस्मान याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. दुपारचे 12.30 वाजताच, सय्यद या जागेवर पोहोचतात. त्यानंतर, सुरू होते मोफत अन्नदान. गरम गरम भात आणि दाळ या गरजू व भूकेल्यांच्या पोटात घालण्याचे पवित्र काम सय्यद यांच्याकडून केलं जातं. गरीब आणि भुकेल्यांची भूक शांत करणं हेच अहजर यांच्या आयुष्याच उद्दिष्ट बनल्याचं दिसून येतंय. 

'भूक का कोई मजहब नही होता', हेच अहजर यांच ब्रीदवाक्य आहे. भाकरीवर सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे भुकेली व्यक्ती कुठल्या जातीची, पंथाची किंवा धर्माची आहे, याचा काहीही फरक पडत नसल्याचे उस्मान यांनी म्हटले. लहानपणी पैशांची कमरतता असल्यामुळे अनेकदा माझे कुटुंब उपाशीपोटी झोपलंय. सहा वर्षांपूर्वी एका फ्लायओव्हरजवळ लक्ष्मी नावाची एक महिला भुकेनं व्याकूळ झाली होती, ती रडत होती. त्यावेळी, तिला मी पोटभर जेवण दिलं. त्यामुळे मलाच मोठं समाधान वाटल. तेव्हापासून जमेल तसं पण दररोज मी फ्लायओव्हर खाली बसणाऱ्या गरजुंना अन्न पुरविण्याचं काम हाती घेतलं. सुरुवातीला मी एकटाच यासाठी पुढाकार घेतला. परंतु, नंतर काहीजण माझ्या मदतीला येऊ लागली. कुणी किराणा सामान देऊन तर कुणी अन्य मार्गाने माझ्या या कामाला गती दिली. त्यामुळे मी येथील गांधी जनरल रुग्णालयात उपाशी रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणं देण्याचे काम सुरू केल. सध्या दररोज 300 ते 400 गरजुंना या माध्यमातून अन्न मिळतं, असे अजहर यांनी सांगितल. 

विशेष म्हणजे अजहर यांनी आपल्या कामाची व्याप्ती राज्याबाहेरही वाढवली आहे. बंगळुरू, रायचूर, तंदूर, झाखंड आणि आसाम राज्यातही हे काम सुरू केल्याचं अजहर यांनी सांगितल. सध्या या सर्व ठिकाणी मिळून जवळपास 1000 ते 1200 जणांना दररोज जेवण देण्यात येत. त्यामुळे मला सर्वात आनंद होतो, असेही अजहर यांनी म्हटले. विशेष म्हणजे अजहर यांच्या या कामाचे स्वत: सलमान खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनीही कौतूक केलं आहे.  

टॅग्स :foodअन्नReligious Placesधार्मिक स्थळे