शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

'भूक का कोई मजहब नही होता साहंब', सहा वर्षांपासून गरिबांची भूक भागवतायंत अजहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 17:51 IST

'भूक का कोई मजहब नही होता', हेच अहजर यांच ब्रीदवाक्य आहे. भाकरीवर सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे भुकेली व्यक्ती कुठल्या जातीची, पंथाची किंवा धर्माची आहे,

हैदराबाद - सय्यद उस्मान अजहर मकसुसी यांनी माणुसकीचा धर्मच सर्वात मोठा असतो, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. हैदराबाद येथील सय्यद उस्मान हे गेल्या 6 वर्षांपासून सातत्याने गरीब, पीडित आणि वंचितांची भूक भागवतात. विशेष म्हणजे दररोज 300 ते 400 लोकांना ते मोफत जेवण देतात. शहरातील दबीरपुरा फ्लायओव्हरजवळ ते दररोज ही सेवा देताना तुम्हाला पाहायला मिळतील. 

हैदराबादच्या दबीरपुरा फ्लायओव्हरजवळील गरीब, भिकारी, बेघर, कचरा विकणारे, मजूर आणि गरजू लोक दररोज दुपारी सय्यद उस्मान याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. दुपारचे 12.30 वाजताच, सय्यद या जागेवर पोहोचतात. त्यानंतर, सुरू होते मोफत अन्नदान. गरम गरम भात आणि दाळ या गरजू व भूकेल्यांच्या पोटात घालण्याचे पवित्र काम सय्यद यांच्याकडून केलं जातं. गरीब आणि भुकेल्यांची भूक शांत करणं हेच अहजर यांच्या आयुष्याच उद्दिष्ट बनल्याचं दिसून येतंय. 

'भूक का कोई मजहब नही होता', हेच अहजर यांच ब्रीदवाक्य आहे. भाकरीवर सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे भुकेली व्यक्ती कुठल्या जातीची, पंथाची किंवा धर्माची आहे, याचा काहीही फरक पडत नसल्याचे उस्मान यांनी म्हटले. लहानपणी पैशांची कमरतता असल्यामुळे अनेकदा माझे कुटुंब उपाशीपोटी झोपलंय. सहा वर्षांपूर्वी एका फ्लायओव्हरजवळ लक्ष्मी नावाची एक महिला भुकेनं व्याकूळ झाली होती, ती रडत होती. त्यावेळी, तिला मी पोटभर जेवण दिलं. त्यामुळे मलाच मोठं समाधान वाटल. तेव्हापासून जमेल तसं पण दररोज मी फ्लायओव्हर खाली बसणाऱ्या गरजुंना अन्न पुरविण्याचं काम हाती घेतलं. सुरुवातीला मी एकटाच यासाठी पुढाकार घेतला. परंतु, नंतर काहीजण माझ्या मदतीला येऊ लागली. कुणी किराणा सामान देऊन तर कुणी अन्य मार्गाने माझ्या या कामाला गती दिली. त्यामुळे मी येथील गांधी जनरल रुग्णालयात उपाशी रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणं देण्याचे काम सुरू केल. सध्या दररोज 300 ते 400 गरजुंना या माध्यमातून अन्न मिळतं, असे अजहर यांनी सांगितल. 

विशेष म्हणजे अजहर यांनी आपल्या कामाची व्याप्ती राज्याबाहेरही वाढवली आहे. बंगळुरू, रायचूर, तंदूर, झाखंड आणि आसाम राज्यातही हे काम सुरू केल्याचं अजहर यांनी सांगितल. सध्या या सर्व ठिकाणी मिळून जवळपास 1000 ते 1200 जणांना दररोज जेवण देण्यात येत. त्यामुळे मला सर्वात आनंद होतो, असेही अजहर यांनी म्हटले. विशेष म्हणजे अजहर यांच्या या कामाचे स्वत: सलमान खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनीही कौतूक केलं आहे.  

टॅग्स :foodअन्नReligious Placesधार्मिक स्थळे