शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मध्य प्रदेशात बोगस मतदार नाहीतच! निवडणूक आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:13 IST

मध्य प्रदेशात बोगस मतदार आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाच्या पथकांच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्यात ६० लाख बोगस मतदार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात बोगस मतदार आढळून आले नसल्याचे निवडणूक आयोगाच्या पथकांच्या पाहणीतून समोर आले आहे. राज्यात ६० लाख बोगस मतदार असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. त्यानंतर आयोगाने या प्रकरणी तपासासाठी दोन पथकांची नियुक्ती केली होती. मात्र, बोगस मतदारांबाबत या पथकांना काहीही माहिती मिळाली नाही.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रकरणातील वास्तव जाणून घेण्यासाठी आयोगाने दोन पथकांची नियुक्ती केली होती. एका पथकाने नरेला आणि भोजपूर विधानसभा मतदारसंघात तपास केला, तर अन्य पथकाने होशंगाबाद आणि सेवनी- मालवा मतदारसंघात कागदपत्रांची पाहणी केली. ही पथके ४ जून रोजी मध्य प्रदेशात दाखल झाली होती.एका अधिकाºयाने सांगितले की, २०१६मध्ये ६८ लाख बनावट मतदारांची ओळख निश्चित करण्यात आली होती. बहुधा याच नोंदींचा तक्रारीत उल्लेख असावा. त्यानंतर बहुतांश प्रकरणांत नोंदी दुरुस्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या त्रुटी दूर करण्यात येतील.सॉफ्टवेअरने शोधलेतपास अधिकाºयांनी सांगितले की, काही ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. एका मतदारसंघात २० मतदान केंद्रांवर तपास करण्यात आला. आमच्या डुप्लिकेशन सॉफ्टवेअरने सुरुवातीला ४६ हजार डुप्लिकेट मतदार शोधून काढले. नंतर तपासणीत याची संख्या २४४२ वर आली. यातील २३९७ नोंदी बरोबर असल्याचे दिसून आले. उर्वरित४४ नोंदींपैकी १२ मतदारांचे निधन झाले आहे, तर काही जण स्थलांतरित झाले आहेत असे दिसून आले. ज्या नोंदीत त्रुटी वा विसंगती आहे अशा नोंदींची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही अहवाल आयोगासमोर ठेवण्यात येणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेश