शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

एका दिवसात ३ चित्रपट कमावताहेत १२० कोटी; मग कुठंय मंदी?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 19:12 IST

मोदींच्या मंत्र्यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचा, देशातील बेरोजगारीचा दावा फेटाळला

मुंबई: देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यासाठी त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला. दोन ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानंच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचं प्रसाद म्हणाले. याशिवाय त्यांनी बेरोजगारीवरील एनएसएसओचा अहवालदेखील चुकीचा असल्याचं म्हटलं. केंद्रीय कायदे मंत्री असलेल्या रवीशंकर प्रसाद यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. यावेळी त्यांनी चित्रपटांच्या कमाईचे आकडे सांगितले. 'मला चित्रपट अतिशय आवडतात. चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. २ ऑक्टोबरला ३ चित्रपट प्रदर्शित झाले. सिने उद्योगाच्या एका जाणकारानं दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानंच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,' असं म्हणत प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा खोडून काढला. 

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच विकास दर इतक्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेसह जगातील अनेक प्रतिष्ठित रेटिंग एजन्सींनी भारताच्या विकास दरात फारशी वाढ होणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्यंतरी बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला. त्यामुळे शेअर बाजारात काही दिवस तेजी होती. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद