शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एका दिवसात ३ चित्रपट कमावताहेत १२० कोटी; मग कुठंय मंदी?; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 19:12 IST

मोदींच्या मंत्र्यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचा, देशातील बेरोजगारीचा दावा फेटाळला

मुंबई: देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. यासाठी त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला. दोन ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानंच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचं प्रसाद म्हणाले. याशिवाय त्यांनी बेरोजगारीवरील एनएसएसओचा अहवालदेखील चुकीचा असल्याचं म्हटलं. केंद्रीय कायदे मंत्री असलेल्या रवीशंकर प्रसाद यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. यावेळी त्यांनी चित्रपटांच्या कमाईचे आकडे सांगितले. 'मला चित्रपट अतिशय आवडतात. चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. २ ऑक्टोबरला ३ चित्रपट प्रदर्शित झाले. सिने उद्योगाच्या एका जाणकारानं दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानंच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,' असं म्हणत प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा खोडून काढला. 

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच विकास दर इतक्या निच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेसह जगातील अनेक प्रतिष्ठित रेटिंग एजन्सींनी भारताच्या विकास दरात फारशी वाढ होणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्यंतरी बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रासाठी सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला. त्यामुळे शेअर बाजारात काही दिवस तेजी होती. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद