शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

ना चालक, ना गार्ड, ट्रेन धावली सुसाट... जम्मू-काश्मीरहून निघालेली मालगाडी ७० किमीनंतर पंजाबमध्ये थांबविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 05:58 IST

दगडांनी भरलेली ५३ डब्यांच्या मालगाडीतून चालक हँडब्रेक न लावता खाली उतरला आणि चहा पिण्यासाठी गेला.

सुरेश एस. डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कजम्मू: 'द बर्निंग ट्रेन' या चित्रपटात जळती रेल्वे कित्येक स्थानके पार करून जातानाचा थरार पाहिला असेल, असाच प्रकार जम्मू- काश्मीरच्या कठुआ स्थानकावर प्रत्यक्षात घडला. विशेष म्हणजे मालगाडीत ना चालक होता, ना गार्ड आणि वेग होता १०० किमी/तास.दगडांनी भरलेली ५३ डब्यांच्या मालगाडीतून चालक हँडब्रेक न लावता खाली उतरला आणि चहा पिण्यासाठी गेला. उतारामुळे मालगाडी पुढे गेली. अधिकाऱ्यांचा पंजाबच्या सुजानपुर, पठाणकोट कैंट, कांदोरी, मिरथल, बांगला येथे गाडी थांबवण्याचा प्रयत्न फोल ठरला.

वाळूच्या गोण्यांनी थांबवली मालगाडीमालगाडीने ७० किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर अखेर मुकेरियनमधील उची बस्सीजवळ वाळूच्या गोण्यांच्या मदतीने एका चढावाच्या ठिकाणी थांबवण्यात यश आले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला, मार्गात कोणतीही गाडी न आल्याने जीवितहानी झाली नाही.

घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरु■ आतापर्यंत चालक किंवा इतर कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.■ रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र ही मालगाडी ७० किलोमीटर चालकाविना धावल्याचा दावा केला. रेल्वे पोलिस (जालंधर) उपनिरीक्षक अशोक कुमार यांनी सांगितले की, धावत्या रेल्वेची माहिती मिळाल्यावर जालंधर- पठाणकोट मार्गावरील सर्व रेल्वे फाटक सुरक्षित करण्यात आले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे