शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

विधानसभा निवडणुकीदरम्यान अर्थसंकल्प नको!

By admin | Updated: October 12, 2016 05:50 IST

केंद्र सरकारने अर्थसंकल्प नियोजित वेळेपेक्षा आधी मांडण्याचा निर्णय घेतला असला तरी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर होणार नाही

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अर्थसंकल्प नियोजित वेळेपेक्षा आधी मांडण्याचा निर्णय घेतला असला तरी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर होणार नाही, याबाबत सरकार गंभीर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.पुढील वर्षाच्या सुरुवातीस उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत पुढील वर्षांच्या सुरुवातीस निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या काळात अर्थसंकल्प सादर झाल्यास मतदारांवर परिणाम होऊ शकतो, तसेच तो आचार संहितेचाही भंग ठरेल, असे बोलले जात आहे. इंग्रजांच्या काळापासून अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी सादर केला जातो. तथापि, त्यामुळे १ एप्रिलपासून म्हणजेच नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून निधी उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. त्यामुळे एक महिना आधीच अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ सप्टेंबर रोजी सैद्धांतिक मंजुरी दिली होती. जेटली यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अर्थसंकल्पाची संपूर्ण प्रक्रिया आणि वित्त विधेयक वेळेच्या आत पूर्ण होऊन १ एप्रिलपासून अर्थसंकल्प लागू व्हावा अशी आमची इच्छा आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जून उजाडतो. तोपर्यंत मान्सून आलेला असतो. अर्थसंकल्पीय खर्चांचा प्रभावी वापर व्हायला आॅक्टोबर उजाडतो. हा खर्च एप्रिलपासूनच सुरू व्हायला हवा, अशी सरकारची इच्छा आहे. २0१७ मध्ये पाच राज्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प व निवडणुका यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)