शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

८ नाही, ४ आठवड्यात निर्णय घ्या; राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वावर उच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:03 IST

गेल्या सुनावणीत, १९ डिसेंबर रोजी, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ मार्च रोजी न्यायालयात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण केंद्र सरकारने तसे केले नाही.

काँग्रेस खासदार  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्रीय गृह मंत्रालयाला चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. मंत्रालयाने या प्रकरणात आठ आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती, ती  न्यायालयाने फेटाळून लावली आणि चार आठवड्यांत त्यावर निर्णय घेण्यास सांगितले. राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्वही असल्याचा आरोप आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न चर्चेत आहे. या मुद्द्यावर एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे.

वकिलांच्या निषेधाला न जुमानता न्यायमूर्ती यशवंत वर्मा अलाहाबाद उच्च न्यायालयात जाणार; कॉलेजियमची शिफारस

गेल्या सुनावणीत, १९ डिसेंबर रोजी, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ मार्च रोजी न्यायालयात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण केंद्र सरकार तसे करू शकले नाही. कर्नाटकचे सामाजिक कार्यकर्ते एस विघ्नेश शिशिर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. यानुसार, राहुल गांधी हे भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे नागरिक आहेत, जे संविधानाच्या कलम ८४(अ) अंतर्गत निवडणूक लढवण्याच्या पात्रता निकषांचे उल्लंघन आहे. जर हे सिद्ध झाले तर राहुल गांधी संसदेचे सदस्यत्व गमावू शकतात.

गेल्या वर्षी, १ जुलै २०२४ रोजी, भाजप नेते आणि वकील एस विघ्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यायामध्ये राहुल गांधी यांचे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा आरोप करण्यात आला होता. याचिकाकर्त्याने आरोप केला होता की हे पत्र २०२२ रोजी ब्रिटिश सरकारकडून आलेला एक गोपनीय मेल होता. याचिकाकर्त्याने भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ च्या कलम ९(२) अंतर्गत राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस