शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रिलायन्स जिओ नेटवर्कमध्येही नंबर 1

By admin | Updated: February 2, 2017 21:36 IST

सर्वेक्षणात रिलायन्स जिओचं नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचं समोर आलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 2 - फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड रिसर्च फर्म क्रेडिट स्विस एक्विटी रिसर्च यांनी वेगवेगळ्या शहरांत डेटा नेटवर्क(मोबाईल इंटरनेट)साठी केलेल्या सर्वेक्षणात रिलायन्स जिओचं नेटवर्क अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूपच जलद असल्याचं समोर आलं आहे.या संस्थेनं 30 शहरांत केलेल्या अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढला आहे. सर्वेक्षणानुसार 80 टक्के शहरांत रिलायन्स जिओ नेटवर्कचे कव्हरेज चांगलं आहे. तर इतर कंपन्यांचं नेटवर्क कव्हरेज फक्त 30 टक्के शहरांत चांगल्या श्रेणीत दाखवण्यात आलं आहे. या संस्थेनं राज्यांच्या राजधानींसह इतरही शहरांत नेटवर्क कव्हरेज आणि स्पीडचं मूल्यमापन केलं आहे. त्यामुळे 4जी नेटवर्कमध्ये जिओ सर्वात प्रगल्भ आणि पुढे असून, इतरही कंपन्यांना त्याच्या श्रेणीत येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच 4जी नेटवर्कच्या स्पीडमध्ये एअरटेल सर्वाधिक म्हणजे 12 एमबीपीएस स्पीडने पुढे आहे. त्याच्या तुलनेत व्होडाफोन, आयडिया आणि रिलायन्स जिओचा स्पीड 7 ते 8 एमबीपीएसच्या दरम्यान आहे. मात्र सध्याच्या घडीला देशात 90 टक्क्यांहून अधिक लोक जिओ नेटवर्क वापरत असल्यानं जिओचा स्पीड सर्वाधिक नोंदवण्यात आला आहे.