शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Bihar Assembly Election 2020 : नितीशकुमारांच्या योजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टळला - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:05 IST

बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी सासाराम येथे घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कोरोना साथीत लागू केलेल्या लॉकडाऊननंतर बिहारमध्ये मोदींची झालेली ही पहिलीवहिली जाहीर प्रचारसभा होती. 

एस. पी. सिन्हा 

पाटणा :बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नसत्या तर राज्यात कोरोना साथीमुळे माणसे मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडली असती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

बिहारच्या विधानसभा निवडणुकांसाठी सासाराम येथे घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कोरोना साथीत लागू केलेल्या लॉकडाऊननंतर बिहारमध्ये मोदींची झालेली ही पहिलीवहिली जाहीर प्रचारसभा होती. 

मोदी यांनी राजद, काँग्रेस आदी विरोधी पक्षांना टोला लगावताना सांगितले, बिहारला बिमारू राज्य बनविणाऱ्यांना जनतेने पुन्हा सत्तेवर आणू नये. कोरोना साथ पसरल्यानंतर राज्य सरकारने वेळीच पावले उचलली नसती, तर अतिशय भयानक स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. एनडीएचे सरकार येण्याआधी बिहारमध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर बोकाळली होती; पण आता नितीशकुमारांच्या कारभारामुळे बिहारमधील स्थितीत आमूलाग्र व चांगला बदल झाला आहे. 

गरिबांच्या कल्याणासाठी असलेला पैसा पूर्वी भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जात असे; पण आता त्याला आळा बसला आहे. त्यामुळेच कोरोना साथीमध्ये राज्यातील गरीब लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करणे शक्य झाले. 

एक लाख मुलांमागे सातच महाविद्यालयेबिहारमध्ये दरवर्षी १६ लाख मुले उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात. त्यामध्ये ९.२ लाख मुले व ६.८ लाख मुली असतात. राज्यामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्याही खूप कमी आहे. 

या राज्यामध्ये १८ ते २३ वर्षे वयोगटातील दर एक लाख मुलांमागे फक्त सात महाविद्यालये आहेत. देशात बिहारमध्ये सर्वात कमी संख्येने युवक उच्च शिक्षण घेतात. ही स्थिती तिथे २०११ पासून कायम आहे.

विरोधकांवर टीका -केंद्रात सत्तेत आल्यास जम्मू-काश्मीरसाठी ३७० कलम पुन्हा लागू करू, असे सांगत जनतेकडून मते मागणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली. बिहारमध्ये एनडीएच्याच हाती पुन्हा सत्ता द्या, असे आवाहनही मोदींनी मतदारांना केले. 

बिहार - १३.६ टक्के युवक घेतात उच्च शिक्षणबिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असल्या तरी त्या राज्यातील युवा मतदारांच्या न सुटलेल्या प्रश्नांबद्दल सर्वच पक्षांनी मौन बाळगले आहे. 

18ते23वर्षे देशामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या वयोगटातील युवकांचे प्रमाण २६.३ टक्के असून, बिहारमध्ये ते फक्त १३.६ टक्के.

100 युवकांमध्ये (१८ ते २३ वर्षे वयोगटातील) बिहारचे अवघे १३ युवक असतात. 

19% झारखंडमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या युवकांचे प्रमाण अधिक म्हणजे आहे. 

2019 साली राष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणासंदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले. त्याच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण खात्याच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात येते. 

2015च्या विधानसभा निवडणुकांत या राज्यात ३१ टक्के युवा मतदार होते, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकांत युवा मतदारांचे प्रमाण २४.६१ टक्के नोंदविले गेले. ३० वर्षे वयाखालील युवकांची संख्या मोजून ही टक्केवारी निश्चित करण्यात आली होती.

बिहारमध्ये उच्च शिक्षण मिळण्याबाबत मुलांपेक्षा मुलींची अवस्था अधिक वाईट आहे. तेथील १२ टक्के मुलीच उच्च शिक्षण घेऊ शकतात. राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत बिहारमध्ये खूपच कमी संख्येने मुली उच्च शिक्षण घेतात.  

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमार