शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार यांच्या मंत्र्याचे लष्कराबाबत वादग्रस्त विधान, नंतर सारवासारव करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 15:26 IST

Bihar News: बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत हे वादग्रस्त विधान केले आहे. आठ वर्षांनंतर देशाचं नाव हिजड्यांच्या फौजेसाठी घेतलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे...

उद्या पूर्णियामध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे. कटिहारमध्ये याची तयारी मंत्री सुरेश यादव हे करत आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत असं विधान केलं आहे, ज्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत हे वादग्रस्त विधान केले आहे. आठ वर्षांनंतर देशाचं नाव हिजड्यांच्या फौजेसाठी घेतलं जाईल. अग्निवीर योजना तयार करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

बिहार सरकारमधील मंत्री सुरेंद्र यादव सध्या शहराशहरामध्ये, गावागावात जाऊन लोकांना या रॅलीमध्ये येण्यासाठी निमंत्रित करत आहेत. याचदरम्यान, गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र याचदरम्यान, अग्निवीर योजनेवर टीका करताना त्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये ही हिजड्यांची फौज सिद्ध होईल, असं विधान केलं.

मात्र जेव्हा या विधानावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराबाबत आम्हाला अभिमान आहे. मात्र आजही आम्ही सरकारच्या अग्निवीर योजनेला विरोध करतो. ही योजना ज्याच्या डोक्यातून बाहेर पडली आहे, त्याला फाशी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानBiharबिहारPoliticsराजकारण