शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

लालूंची साथ सोडल्यास नितीश कुमारांना समर्थन- मोदी

By admin | Updated: May 8, 2017 15:31 IST

भाजपानं लालूंची साथ सोडल्यास नितीश कुमारांना समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला असतानाच आता भाजपानंही त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. लालूंची साथ सोडल्यास नितीश कुमारांना समर्थन देण्याची तयारी भाजपानं दर्शवली आहे. जर नितीश कुमारांनी लालूप्रसाद यादव यांची साथ सोडली तर भाजपा नितीश कुमारांना समर्थन देण्याचा विचार करेल, असं वक्तव्य भाजपाचे बिहारमधील वजनदार नेते सुशील मोदींनी केलं आहे. 

चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांना झटका दिल्यानंतर सुशील मोदींनी हे वक्तव्य केल्यानं त्याला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झालं आहे.लालू प्रसाद यादव यांच्यावरील गुन्हेगारी कारस्थान रचल्याच्या आरोपांवरून पुन्हा खटला चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत. त्यानंतर लागलीच सुशील मोदींनी नितीश कुमारांना ही ऑफर देऊन टाकली आहे. नितीश कुमारांनी जर लालू प्रसाद यादवांची साथ सोडली, तर त्यांच्या सरकारला समर्थन देण्याचा भाजपा विचार करेल, असंही ते म्हणाले आहेत. तसेच सुशील मोदींनी दावा केला आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार लालूप्रसाद यादवांचा फोन टॅप करत आहेत. बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडीसहीत काँग्रेसच्या महाआघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं होतं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीश-लालू एकमेकांचे शत्रू समजले जात होते. मात्र दोन्ही पार्टींची आघाडी झाल्यानं त्यांचं सरकार आलं. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेनामी संपत्तीचा प्रकरणही चर्चेत आहे.(चारा घोटाळयात लालूप्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने दिला झटका)तत्पूर्वी 900 कोटी रुपयांच्या चारा घोटाळयात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि अऩ्य आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जोरदार झटका दिला. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्यावरील गुन्हेगारी कारस्थान रचल्याच्या आरोपाची पुन्हा सुनावणी होणार आहे. संपूर्ण चारा घोटाळा प्रकरण एकच आहे. त्यामुळे लालूंविरोधात प्रत्येक प्रकरणाची वेगळी सुनावणी घेऊ नये असा आदेश देताना झारखंड उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील कारस्थान रचल्याचा आरोप रद्द केला होता. या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.