शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

नितीशकुमार आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता

By admin | Updated: July 16, 2017 09:09 IST

नितीशकुमार यांनी आज रविवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 16 - राज्यात सत्ताधारी आघाडीतल्या राष्ट्रीय जनता दल आणि जनता दलातील (संयुक्त) या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सरकारने पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित न राहिल्यामुळे आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय जनता दलाला दिलेली चार दिवसांची मुदत संपली आहे, तरीसुद्धा तेजस्वी यादव यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही आणि त्यांनी राजीनामा देण्याची गरजच नाही, असे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जाहीरच केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी आज रविवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत तेजस्वी यांना बरखास्त करण्याचा निर्णय झाला तर नितीश सरकार पडेल आणि नवी राजकीय समीकरणे सुरू होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलानं सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास केवळ भाजपाचे 58 आमदार जनता दलाच्या सरकारला तारू शकतात. मात्र, भाजपाच्या जवळ गेल्यास हक्काची मतं गमावण्याची भीती जनता दलाला सतावते आहे. 2010च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडनं 141 जागा लढवून 115 उमेदवार जिंकून आणले होते. मात्र 2013मध्ये मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. राष्ट्रीय जनता दलानं 2010मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवून केवळ 22 जागा जिंकल्या होत्या. तेजस्वींवर तुरुंगात जाण्याची वेळ आल्यास आघाडी तोडण्यासाठी लालू पुढाकार घेणार नाहीत. भाजपला दूर ठेवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देतील.

सध्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आरजेडीने आपल्या 80 आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला होता. राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे 80 आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते. आणखी वाचा

जेडीयूचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते संजय सिंह म्हणाले होते की, आरजेडीने आपल्या 80 आमदारांचा गर्व बाळगू नये. त्यांनी 2010मधील आपली 22 आमदारांची संख्या लक्षात ठेवली पाहिजे. 2015 साली आरजेडीच्या वाढलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये नितीश कुमार यांच्या विश्वासार्ह चेहऱ्याचा मोठा हात होता हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधाल रेल्वेच्या हॉटेल घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले असून, त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सध्या 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे 80, संयुक्त जनता दलाचे 71, काँग्रेसचे 27 आणि भाजपाचे 53 आमदार आहेत.