शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमार आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता

By admin | Updated: July 16, 2017 09:09 IST

नितीशकुमार यांनी आज रविवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमतबिहार, दि. 16 - राज्यात सत्ताधारी आघाडीतल्या राष्ट्रीय जनता दल आणि जनता दलातील (संयुक्त) या दोन्ही पक्षांमधील वाद विकोपाला गेला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सरकारने पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव उपस्थित न राहिल्यामुळे आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय जनता दलाला दिलेली चार दिवसांची मुदत संपली आहे, तरीसुद्धा तेजस्वी यादव यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही आणि त्यांनी राजीनामा देण्याची गरजच नाही, असे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी जाहीरच केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी आज रविवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत तेजस्वी यांना बरखास्त करण्याचा निर्णय झाला तर नितीश सरकार पडेल आणि नवी राजकीय समीकरणे सुरू होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलानं सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास केवळ भाजपाचे 58 आमदार जनता दलाच्या सरकारला तारू शकतात. मात्र, भाजपाच्या जवळ गेल्यास हक्काची मतं गमावण्याची भीती जनता दलाला सतावते आहे. 2010च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडनं 141 जागा लढवून 115 उमेदवार जिंकून आणले होते. मात्र 2013मध्ये मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. राष्ट्रीय जनता दलानं 2010मध्ये स्वतंत्र निवडणूक लढवून केवळ 22 जागा जिंकल्या होत्या. तेजस्वींवर तुरुंगात जाण्याची वेळ आल्यास आघाडी तोडण्यासाठी लालू पुढाकार घेणार नाहीत. भाजपला दूर ठेवण्यासाठी बाहेरून पाठिंबा देतील.

सध्या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आरजेडीने आपल्या 80 आमदारांचा धाक दाखवण्याऐवजी तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, असा टोला जेडीयूने लगावला होता. राष्ट्रीय जनता दलाचे बिहार अध्यक्ष रामचंद्र पूर्वे यांनी आपल्या पक्षाकडे 80 आमदारांचे बळ असल्याचे वक्तव्य केले होते. आणखी वाचा

जेडीयूचे बिहारमधील मुख्य प्रवक्ते संजय सिंह म्हणाले होते की, आरजेडीने आपल्या 80 आमदारांचा गर्व बाळगू नये. त्यांनी 2010मधील आपली 22 आमदारांची संख्या लक्षात ठेवली पाहिजे. 2015 साली आरजेडीच्या वाढलेल्या आमदारांच्या संख्येमध्ये नितीश कुमार यांच्या विश्वासार्ह चेहऱ्याचा मोठा हात होता हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधाल रेल्वेच्या हॉटेल घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले असून, त्यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सध्या 243 सदस्य असलेल्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे 80, संयुक्त जनता दलाचे 71, काँग्रेसचे 27 आणि भाजपाचे 53 आमदार आहेत.