शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीशकुमार

By admin | Updated: April 11, 2016 02:29 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची रविवारी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नितीशकुमार हे आता राष्ट्रीय राजकारणात

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची रविवारी संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे नितीशकुमार हे आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.२०१९ च्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आणि संजदचे अध्यक्षपद अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. संजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने नितीशकुमार यांची पक्षाध्यक्षपदी निवड करून १९८९ मध्ये दिवंगत व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात असलेल्या जनता दलाचे पुनरुज्जीवन होण्याचे संकेत दिले आहेत. सर्व जुन्या बिगर काँग्रेसी आणि बिगर भाजप धर्मनिरपेक्ष पक्षांचे विलीनीकरण करणे हे नितीशकुमार यांचे ध्येय आहे. लालूप्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय जनता दलाचेही येत्या काही महिन्यांत संयुक्त जनता दलात विलीनीकरण करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि डाव्या आघाडीसोबत, तर विविध राज्यांमध्ये अन्य दहा पक्षांसोबत आघाडी केलेली असेल. २०१९ ची लोकसभा निवडणूक ‘मोदी विरुद्ध अन्य सर्व’, अशी बनविणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.नितीशकुमार यांनी हे ध्येय गाठावे, अशी जबर इच्छा असल्यामुळेच शरद यादव यांनी संयुक्त जनता दलाचा चौथ्यांदा अध्यक्ष बनण्यास नकार दिला, अशी माहिती यादव यांच्याशी जवळीक असलेल्या सूत्रांनी दिली. यादव यांना सलग तिसऱ्यांदा पक्षाध्यक्ष बनविण्यासाठी २०१३ मध्ये संयुक्त जनता दलाच्या घटनेत बदल करण्यात आला होता.मागच्या दहा दिवसांत नितीशकुमार यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत दोन वेळा बैठक घेतली आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनाही ते भेटले, असे सूत्रांनी सांगितले.> जनता दलाने केंद्रातील सत्ता गमावल्यानंतर या पक्षाचे अनेक तुकडे झाले होते. वेगवेगळ्या झालेल्या या जनता दल परिवाराचे पुन्हा एकत्रीकरण करण्याचा आणि पुन्हा एक पक्ष निर्माण करण्याचा आपला हेतू आहे, असे नितीशकुमार यांनी पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जाहीर केले. नितीशकुमार यांनी या ऐक्याबाबत अगोदरच रालोदचे अजित सिंग, जनता दल (एस)च्या केरळ गटाचे ए.पी. वीरेंद्र कुमार, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा, एसजेपीचे नेते कमल मोरारका आणि अन्य नेत्यांसोबत चर्चा केलेली असल्यामुळे जनता परिवाराच्या एकीकरणाची तशीही सुरुवात झालेली आहे.