शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

28 वर्षांच्या मुलाला घाबरले नितीश कुमार - तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:14 IST

नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. शिवाय, ते 28 वर्षांच्या एका मुलाला घाबरलेत, असेही तेजस्वी यादव म्हणालेत.

पाटणा, दि. 27 -  संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी (26 जुलै ) तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  नितीश कुमार यांनी  बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपाने त्यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.  बिहारमधील महायुती फूट पडल्यानंतर मात्र येथील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. 

बिहारमधील राजकीय घडामोडीनितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात विरोधकांच्या खुर्चीत असलेल्या भाजपासोबत हातमिळवणी केली. नितीश कुमार यांना भाजपाचं समर्थन मिळाल्यानंतर जदयू व भाजपाचे आमदार राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला.  राजभवनातून बाहेर आल्यानंतर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना सांगितले की, राज्यपालांनी नितीश कुमार यांना गुरुवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

तेजस्वी यादव यांचा विरोधतर दुसरीकडे आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना सत्तास्थापना आणि शपथविधिसाठी देण्यात आलेले आमंत्रणाला विरोध दर्शवला आहे. याविरोधात आरजेडी व काँग्रेसच्या आमदारांनी बुधवारी रात्री राजभवनापर्यंत मोर्चादेखील काढला. आरजेडी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, पार्टीनं राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांच्या शपथविधिबाबत पुन्हा समीक्षा करण्याची विनंती केली आहे. शिवाय, कायद्यानुसार त्यांनी मोठ्या राजकीय पक्षाला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी बोलावले पाहिजे. 

पुढे ते असेही म्हणालेत की, नितीश कुमार अखेर कोणत्या आधारावर भाजपासोबत सत्तास्थापन करत आहेत. ते 28 वर्षांच्या एका मुलाला घाबरलेत. त्यांच्यात हिम्मत असल्यास त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. नितीश कुमार महायुती तोडून भाजपासोबत हातमिळवणी करण्यासाठी केवळ निमित्त शोधत होते, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे. 

''बिहारच्या जनतेचा विश्वासघात''दरम्यान, तेजस्वी यादव व लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणासंबंधी सीबीआय व ईडीनं कारवाई केल्यापासून बिहारमधील महायुतीत गोंधळ निर्माण झाला.  तेजस्वी यादव यावर म्हणालेत की, आमच्याविरोधात कटकारस्थान रचून आरोप करण्यात आलेत. शिवाय, नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणालेत.