शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

28 वर्षांच्या मुलाला घाबरले नितीश कुमार - तेजस्वी यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 09:14 IST

नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. शिवाय, ते 28 वर्षांच्या एका मुलाला घाबरलेत, असेही तेजस्वी यादव म्हणालेत.

पाटणा, दि. 27 -  संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बुधवारी (26 जुलै ) तडकाफडकी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  नितीश कुमार यांनी  बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपाने त्यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.  बिहारमधील महायुती फूट पडल्यानंतर मात्र येथील राजकीय परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. 

बिहारमधील राजकीय घडामोडीनितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात विरोधकांच्या खुर्चीत असलेल्या भाजपासोबत हातमिळवणी केली. नितीश कुमार यांना भाजपाचं समर्थन मिळाल्यानंतर जदयू व भाजपाचे आमदार राजभवनात पोहोचले आणि त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला.  राजभवनातून बाहेर आल्यानंतर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना सांगितले की, राज्यपालांनी नितीश कुमार यांना गुरुवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

तेजस्वी यादव यांचा विरोधतर दुसरीकडे आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना सत्तास्थापना आणि शपथविधिसाठी देण्यात आलेले आमंत्रणाला विरोध दर्शवला आहे. याविरोधात आरजेडी व काँग्रेसच्या आमदारांनी बुधवारी रात्री राजभवनापर्यंत मोर्चादेखील काढला. आरजेडी नेत्यांसोबत राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, पार्टीनं राज्यपालांची भेट घेऊन नितीश कुमार यांच्या शपथविधिबाबत पुन्हा समीक्षा करण्याची विनंती केली आहे. शिवाय, कायद्यानुसार त्यांनी मोठ्या राजकीय पक्षाला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी बोलावले पाहिजे. 

पुढे ते असेही म्हणालेत की, नितीश कुमार अखेर कोणत्या आधारावर भाजपासोबत सत्तास्थापन करत आहेत. ते 28 वर्षांच्या एका मुलाला घाबरलेत. त्यांच्यात हिम्मत असल्यास त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. नितीश कुमार महायुती तोडून भाजपासोबत हातमिळवणी करण्यासाठी केवळ निमित्त शोधत होते, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला आहे. 

''बिहारच्या जनतेचा विश्वासघात''दरम्यान, तेजस्वी यादव व लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणासंबंधी सीबीआय व ईडीनं कारवाई केल्यापासून बिहारमधील महायुतीत गोंधळ निर्माण झाला.  तेजस्वी यादव यावर म्हणालेत की, आमच्याविरोधात कटकारस्थान रचून आरोप करण्यात आलेत. शिवाय, नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणालेत.