शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Road Safetyसाठी नितीन गडकरींनी घेतला मोठा निर्णय, या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 20:58 IST

Road Safety: रोड सेफ्टीला अधिक चांगले बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - रोड सेफ्टीला अधिक चांगले बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करन सांगितले की, कारमध्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य करण्यासाठी अध्यादेशाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व विभागातील कारमधील पॅसेंजरची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे. कारची किंमत आणि प्रकाराचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

गडकरी यांनी सांगितले की, हा निर्णय एम१ कॅटॅगरीमधील कारसाठी घेण्यात आला आहे. एम१ कॅटॅगरीमध्ये ५ ते ८ सिटर कारचा समावेश आहे. अशाप्रकारे मिड-रेंजच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य असेल. या नव्या निर्णयानंतर कारमध्ये दोन साइड एअरबॅग आणि दोन साईड कार्टेनसुद्धा लागतील. त्यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांसाठीसुद्धा सुरक्षा सुनिश्चित होणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी पहिल्या ड्रायव्हर सिटसाठी एअरबॅन अनिवार्य केलं होतं. यावर्षी १ जानेवारी २०२२पासून सर्व कारमध्ये ड्रायव्हरसह को-पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कारमध्ये दोन एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर निश्चितपणे कार कंपन्यांचा खर्च वाढणारा आहे. एक एअरबॅगची किंमत १८०० ते २००० रुपयांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत ६ एअरबॅग लावण्यासाठी एकूण १० ते १२ हजार रुपये खर्च होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या मते एअर बॅगची मागणी वाढल्याने याची किंमत कमी होणार आहे.

रस्ते दुर्घटनेमध्ये जीव गमावणाऱ्यांमध्ये भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. नितीन गडकरी वेगवेगळ्या मंचावरून यामध्ये घट करण्यासाठी मत मांडत असतात. आता सरकारच्या या पावलाकडे त्याचाच एक भाग म्हणून पाहिले जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाcarकारNitin Gadkariनितीन गडकरी