शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नोटाबंदी, जीएसटी हे मोदींनी लावलेले सुरुंग; ८ नोव्हेंबरच्या ‘काळ्या दिना’वर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:12 IST

नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) हे दोन सुरुंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला लावले, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.

नवी दिल्ली : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) हे दोन सुरुंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला लावले, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला. पक्षाच्या येथील मुख्यालयाबाहेर वार्ताहरांशी बोलताना गांधी म्हणाले की, नोटाबंदीच्या सुरुंगाचा फटका सोसण्यास अर्थव्यवस्था सक्षम होती; परंतु जीएसटीच्या दुसºया सुरुंगाला ती सहन करू शकली नाही, आता तिच्या चिंध्या झाल्या आहेत.नोटाबंदी आणि जीएसटीमुळे लोकांना किती त्रास आणि दु:ख झाले आहे हे मोदी समजून घेऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यांचे प्रभारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष झाल्याच्या दिवशी कोणते कार्यक्रम राबवायचे, यावर चर्चा झाली.जीएसटीच्या मुद्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक झाली.नोटाबंदीचा निर्णय हा मोठा फटका होता, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण देशासाठी ८ नोव्हेंबर हा ‘दु:खाचा दिवस’ आहे. ते जरी ८ नोव्हेंबर साजरा करणार असले तरी सामान्य माणसाला त्या निर्णयामुळे जो त्रास झाला तो त्यांनी समजून घ्यायची गरज आहे. नोटाबंदी हा एक सुरुंगच होता. ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष ‘काळा दिन’ म्हणून पाळणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी