शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36'

By महेश गलांडे | Updated: February 2, 2021 13:29 IST

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा 2021 सालचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी लक्षणीय 137 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं असून देशाला आत्मनिर्भर बनविणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपा नेते आणि सत्ताधारी पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी मोदी सरकार आणि अर्थमंत्र्यांना लक्ष्य केलंय. विशेष म्हणजे निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात टीम इंडियाच्या विजयाचे कौतुक केले होते. मात्र, निर्मला सितारमण यांची बॅटींग म्हणजे ऑल आऊट 36 अशी असल्याची टीका काँग्रेसने केलीय. 

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.'', असे अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना म्हटलं होतं. यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सितारमण यांची अर्थसंकल्पातील बॅटींग कशी होती?. त्यावर, चिदंबरम यांनी मजेशीर उत्तर दिलंय.   

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती. सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे, चिदंबरम यांनी निर्मला सितारमण यांची बॅटींगही अॅडलेड कसोटीतील ऑल आऊट 36 प्रमाणे होती, असे म्हटंलय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय. 

Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...

अॅडलेड कसोटीनंतर संकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेनं सक्षमपणे सांभाळून सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकाऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. शुबमन गिल, रिषभ पंत, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सूंदर, मोहम्मद सिराज यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.  टीम इंडियानं मालिका जिंकली

कोरोना व्हायरसमुळे २०२० हे वर्ष लॉकडाऊनमध्येच गेलं आणि त्यात प्रत्येकाचं आयुष्यच लॉक करून टाकलं. मात्र, हळू हळू अनलॉक सुरु होताच क्रिकेटनं प्रत्येकाच्या आयुष्यात संजीवनीरुपी एन्ट्री घेतली. आपापल्या घरातच अडकून पडलेल्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL 2020) आणि त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनं ( India vs Australia) हास्य फुलवले. ऑस्ट्रेलियातील मालिकेनं प्रत्येकाला आयुष्यातील खूप मोठा अन् महत्त्वपूर्ण अर्थ समजावून सांगितला. या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडिया सर्वात निचांक धावसंख्येवर तंबूत परतली आणि त्यानंतर एकदम फिनिक्स भरारी घेताना २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसchidambaram-pcचिदंबरम