शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36'

By महेश गलांडे | Updated: February 2, 2021 13:29 IST

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा 2021 सालचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी लक्षणीय 137 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं असून देशाला आत्मनिर्भर बनविणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपा नेते आणि सत्ताधारी पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी मोदी सरकार आणि अर्थमंत्र्यांना लक्ष्य केलंय. विशेष म्हणजे निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात टीम इंडियाच्या विजयाचे कौतुक केले होते. मात्र, निर्मला सितारमण यांची बॅटींग म्हणजे ऑल आऊट 36 अशी असल्याची टीका काँग्रेसने केलीय. 

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.'', असे अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना म्हटलं होतं. यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सितारमण यांची अर्थसंकल्पातील बॅटींग कशी होती?. त्यावर, चिदंबरम यांनी मजेशीर उत्तर दिलंय.   

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती. सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे, चिदंबरम यांनी निर्मला सितारमण यांची बॅटींगही अॅडलेड कसोटीतील ऑल आऊट 36 प्रमाणे होती, असे म्हटंलय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय. 

Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...

अॅडलेड कसोटीनंतर संकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेनं सक्षमपणे सांभाळून सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकाऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. शुबमन गिल, रिषभ पंत, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सूंदर, मोहम्मद सिराज यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.  टीम इंडियानं मालिका जिंकली

कोरोना व्हायरसमुळे २०२० हे वर्ष लॉकडाऊनमध्येच गेलं आणि त्यात प्रत्येकाचं आयुष्यच लॉक करून टाकलं. मात्र, हळू हळू अनलॉक सुरु होताच क्रिकेटनं प्रत्येकाच्या आयुष्यात संजीवनीरुपी एन्ट्री घेतली. आपापल्या घरातच अडकून पडलेल्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL 2020) आणि त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनं ( India vs Australia) हास्य फुलवले. ऑस्ट्रेलियातील मालिकेनं प्रत्येकाला आयुष्यातील खूप मोठा अन् महत्त्वपूर्ण अर्थ समजावून सांगितला. या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडिया सर्वात निचांक धावसंख्येवर तंबूत परतली आणि त्यानंतर एकदम फिनिक्स भरारी घेताना २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसchidambaram-pcचिदंबरम