शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

निर्मला सितारमण यांची अर्थसंकल्पीय बॅटींग म्हणजे ऑस्ट्रेलियातील 'ऑल आऊट 36'

By महेश गलांडे | Updated: February 2, 2021 13:29 IST

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती.

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा 2021 सालचा अर्थसंकल्प सोमवारी सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी लक्षणीय 137 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. सितारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं असून देशाला आत्मनिर्भर बनविणारा हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपा नेते आणि सत्ताधारी पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी मोदी सरकार आणि अर्थमंत्र्यांना लक्ष्य केलंय. विशेष म्हणजे निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात टीम इंडियाच्या विजयाचे कौतुक केले होते. मात्र, निर्मला सितारमण यांची बॅटींग म्हणजे ऑल आऊट 36 अशी असल्याची टीका काँग्रेसने केलीय. 

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी सोमवारी बजेट सादर केला. त्यांनी यावेळी सांगितले की, ''मागील वर्ष हे सर्वांसाठी आव्हानात्मक ठरले. भारतीयांनी या संकटाचाही धैर्यानं सामना केला. भारताच्या अर्थव्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम झाला, परंतु त्यातूनही आपण चांगले पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानं भारतातील प्रत्येकाला त्यांच्यात असलेल्या ताकदीची आठवण करून दिली.'', असे अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करताना म्हटलं होतं. यासंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना प्रश्न विचारण्यात आला होता. सितारमण यांची अर्थसंकल्पातील बॅटींग कशी होती?. त्यावर, चिदंबरम यांनी मजेशीर उत्तर दिलंय.   

ऑस्ट्रेलियातील अॅडलेड कसोटीतील टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला होता. भारत ०-१ असा पिछाडीवर होता, त्यावेळी भारतीय संघाची मोठी नाचक्की झाली होती. सर्वच स्तरातून भारतीय संघावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे, चिदंबरम यांनी निर्मला सितारमण यांची बॅटींगही अॅडलेड कसोटीतील ऑल आऊट 36 प्रमाणे होती, असे म्हटंलय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना चिदंबरम यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय. 

Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...

अॅडलेड कसोटीनंतर संकटात असलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेनं सक्षमपणे सांभाळून सर्वांची मनं जिंकली. मेलबर्न कसोटीत खणखणीत शतक झळकावून त्यानं अन्य सहकाऱ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. त्यानंतर युवा गोलंदाजांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहून त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेतली. रवींद्र जडेजामुळे धावबाद झाल्यानंतरही रागावण्याऐवजी अजिंक्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला हताश होऊ नको, असा सल्ला दिला. शुबमन गिल, रिषभ पंत, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सूंदर, मोहम्मद सिराज यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.  टीम इंडियानं मालिका जिंकली

कोरोना व्हायरसमुळे २०२० हे वर्ष लॉकडाऊनमध्येच गेलं आणि त्यात प्रत्येकाचं आयुष्यच लॉक करून टाकलं. मात्र, हळू हळू अनलॉक सुरु होताच क्रिकेटनं प्रत्येकाच्या आयुष्यात संजीवनीरुपी एन्ट्री घेतली. आपापल्या घरातच अडकून पडलेल्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीला इंडियन प्रीमिअर लीगनं ( IPL 2020) आणि त्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनं ( India vs Australia) हास्य फुलवले. ऑस्ट्रेलियातील मालिकेनं प्रत्येकाला आयुष्यातील खूप मोठा अन् महत्त्वपूर्ण अर्थ समजावून सांगितला. या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडिया सर्वात निचांक धावसंख्येवर तंबूत परतली आणि त्यानंतर एकदम फिनिक्स भरारी घेताना २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसchidambaram-pcचिदंबरम