शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:42 IST

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

विजयवाडा : पूर्व लडाखमधील सीमेवरून आपापले सैन्य माघारी बोलाविण्यासंदर्भात भारत व चीनमधील लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. तोडगा काढण्यासाठी ही चर्चा यापुढेही सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली.आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. पूर्व लडाखमधील प्रश्न हा अतिशय गुंतागुंतीचा आहे. तो प्रश्न सोडविताना भौगोलिक स्थिती, सैन्य कुठे नेमके तैनात आहे, तेथील स्थिती नेमकी कशी आहे या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्याचा आढावा घेऊनच भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.पूर्व लडाख व अन्य प्रश्नांसंदर्भात भारत व चीन यांच्यामध्ये मंत्रिस्तरावर चर्चा होण्याची शक्यता आहे का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. एस. जयशंकर उत्तर देत होते. (वृत्तसंस्था)नऊ महिने तणाव कायमपूर्व लडाखमध्ये चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. या भागात दोन्ही देशांमध्ये ५ मेपासून प्रचंड तणाव आहे. या सीमेवर दोन्ही देशांनी वाढीव सैन्य तैनात केले असून राजनैतिक, लष्करी पातळीवर झालेल्या चर्चांतून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणाव