शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सुपरस्टार राजकुमार अपहरणातील नऊ आरोपी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 05:22 IST

कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार यांचे ३० जुलै २००० रोजी अपहरण करणाऱ्या १४ पैकी ९ आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

इरोड - कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार यांचे ३० जुलै २००० रोजी अपहरण करणाऱ्या १४ पैकी ९ आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. चंदनतस्कर वीरप्पन व त्याच्या १४ साथीदारांनी १८ वर्षांपूर्वी राजकुमार यांचे अपहरण केल्याने खळबळ उडाली होती.अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोबीचेट्टीपलायम यांनी निकाल देताना म्हटले आहे की, या नऊ जणांवरील आरोप सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे सरकारी पक्षाला न्यायालयात सादर करता आले नाहीत. या खटल्यात ४७ जणांनी साक्षी दिल्या होत्या; पण त्यातूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही.तामिळनाडूतील दोड्डा गजनूर या गावात असलेल्या फार्महाऊसमधून राजकुमार यांचे अपहरण करण्यात आले होते. तलवडी येथील जंगलक्षेत्रात ते १०० पेक्षा जास्त दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते. या काळात तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांचे संबंध विलक्षण तणावाचे बनले होते. अखेर १०८ व्या दिवशी राजकुमार यांची अपहरणकर्त्यांनी मुक्तता केली. वीरप्पनच्या नऊ साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.या आरोपींना नंतर जामीनही मिळाला होता. न्यायाधीशांनी निकालपत्राचे वाचन केले त्यावेळी पुत्तुसामी हा आरोपी वगळता अन्य सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते. पुत्तुसामी याची प्रकृती बिघडल्याने तो हजर राहू शकला नाही. महत्त्वाच्या खटल्याचा निकाल असल्याने न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वृत्तसंस्था)वीरप्पनची दहशतया प्रकरणी राजकुमार यांच्या पत्नीने वीरप्पन व त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.२००४ साली धर्मपुरी येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत वीरप्पन व त्याचे तीन साथीदार मारले गेले होते. चंदन व हस्तीदंताची तस्करी हा वीरप्पनचा उद्योग होता.सत्यमंगलमच्या जंगलातील चंदनाची हजारो झाडे त्याने तोडली आणि हत्तींनाही ठार केले होते. त्याला पकडण्यासाठी तामिळनाडू व कर्नाटक पोलिसांनी अनेक मोहिमा राबविल्या होेत्या.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या