शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणतात, पाच वर्षांत अर्थव्यवस्थेचा दुपटीने विकास निव्वळ अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:31 IST

भारताला ‘विकसित देश’ व्हायला आणखी २२ वर्षे लागतील

अहमदाबाद : भारतीय अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच लाख अब्ज डॉलरची करण्याच्या गप्पा काही लोक मारत असले तरी ते अशक्य आहे. सातत्याने जोमदार विकासदर कायम ठेवला तरी भारताला ‘विकसित देश’ व्हायला आणखी २२ वर्षे लागतील, असे प्रतिपादन नामवंत अर्थतज्ज्ञ व रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी गुरुवारी येथे केले.येथील एका कार्यक्रमात डॉ. रंगराजन म्हणाले की, आज भारतीय अर्थव्यवस्था सुमारे २.७ लाख अब्ज डॉलरची आहे. ती दुपटीने वाढविण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. हे लक्ष्य येत्या पाच वर्षांत गाठायचे असेल तर या काळात विकासदर सातत्याने नऊ टक्क्यांहून अधिक असावा लागेल. पण ते अशक्य वाटते. आधीच दोन वर्षे वाया गेली. यंदाचा विकासदर जेमतेम सहा टक्क्यांच्या आसपास आहे व पुढील वर्षीही तो फार तर सात टक्क्के राहील, असे संकेत आहेत. त्यानंतर तो जरी वाढला तरी त्याने सन २०२५ पर्यंत पाच लाख अब्ज डॉलरचे लक्ष्य गाठणे अशक्य आहे. तसेच अर्थव्यवस्थेत आलेली मंदी दूर करण्यासाठी उपाय त्वरीत करावे लागतील असे सांगून रंगराजन म्हणाले की, सरकारने जास्तीत जास्त पैसा खर्च करणे हा त्यासाठी एक उपाय असू शकतो. पण तसे करण्यासाठी सरकारला पुरेला निधी उपलब्ध होण्याची चिन्हे फार कमी दिसतात. (वृत्तसंस्था)२२ वर्षे विकासदर ९ टक्के हवाडॉ. रंगराजन पुढे म्हणाले की, अर्थव्यवस्थेने पाच लाख अब्ज डॉलरचा टप्पा गाठला तरी आपले दरडोई उत्पन्न सध्याच्या १८०० डॉलरवरून दुप्पट म्हणजे ३,६०० डॉलरवर पोहोचेल. तरीही भारत विकसित देश न होता निम्न-मध्यम उत्पन्न गटातील देश राहील. ते म्हणाले की, त्यापुढील टप्पा म्हणजे उच्च-मध्य उत्पन्न गटात जाण्यासाठी डरडोई उत्पन्न ३,८०० डॉलर व्हावे लागेल व त्याला आणखी काही वर्षे जावी लागतील. ज्याचे दरडोई उत्पन्न किमान १२,००० डॉलर असते असा देश ‘विकसित’ म्हणून ओळखला जातो. भारताने पुढील २२ वर्षे विकासदर सातत्याने नऊ टक्के ठेवला तरच तो पल्ला गाठणे शक्य होईल.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक