शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

दुसऱ्या दिवशीही राज्यसभेचे कामकाज गोंधळात तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:19 IST

या गोंधळामुळे सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब केले. त्यानंतर दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली;

नवी दिल्ली : अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना राज्यसभेत कागदपत्रे मांडू देण्यास काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी हरकत घेतल्याने मंगळवारी राज्यसभेत गोंधळ सुरू झाला. या गोंधळामुळे सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यसभेचे कामकाज दोनदा तहकूब केले. त्यानंतर दिल्ली हिंसाचारावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केली; पण लगेच चर्चा करावी, ही मागणी मान्य न झाल्याने गोंधळ सुरूच राहिला. परिणामी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.अनुराग ठाकूर प्रकरणातील गदारोळानंतर कामकाज सुरू झाले, तेव्हाही गोंधळ सुरू झाला. आरोग्यमंत्री हर्षवर्धन, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी कागदपत्रे सभागृहात मांडल्यानंतर अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी कागदपत्रे मांडण्यास सुरुवात केली. ते उभे राहताच काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात ‘गोली मारो’चे प्रक्षोभक विधान केले होते.काँग्रेसचे सगळे सदस्य उभे राहून ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध करीत होते. काँग्रेसला द्रमुकच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरुवात केली. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.>लोकसभेतही गदारोळदिल्लीतील हिंसाचारावरून लोकसभेत दुसºया दिवशी मंगळवारीही गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत सभागृहाचे कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर सभापतींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विधेयक सादर करण्यास सांगितले.संपूर्ण विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करीत होते आणि दिल्लीतील हिंसाचारावर चर्चेची मागणी करीत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी करीत होते. विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती आणि त्यांनी काही कागद फाडले. तरीही सभापतींनी कामकाज सुरूच ठेवले. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी सभापतींच्याजवळ पोहोचले आणि घोषणाबाजी केली. गोंधळ वाढत गेला तेव्हा सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा