शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:32 IST

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते.

गोपाळगंज – बिहारमध्ये सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे, एकीकडे पुराचा कहर तर दुसरीकडे कोरोनाची महामारी. ही परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुशासनचा दावा करणाऱ्या नितीश सरकारची पोलखोल गोपाळगंजमधील पूलाचा काही भाग कोसळल्याने उघड झाला आहे. एक महिन्यापूर्वी सत्तरघाट महासेतूचं उद्धाटन करण्यात आलं होतं. यासाठी जवळपास २६४ कोटींचा खर्च झाला होता.

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी, बेतिया याठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हा पूल गोपाळगंजला चंपारणपासून तिरहुतच्या अनेक जिल्ह्यांना जोडतो. गोपाळगंज येथे बुधवारी ३ लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले. अतिवेगात आलेल्या पाण्यामुळे पूलाचा काही भाग कोसळला.

बैकुंठपूरच्या फैजुल्लाहपूर येथे हा पूल तुटला आहे. भाजपा आमदार मिथिलेश तिवारी यांनी या घटनेची माहिती बिहारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री नंदकिशोर यादव यांना दिली आहे. या पूलाचं बांधकाम ब्रीज निर्माण विभागाकडून करण्यात आलं होतं. २०१२ मध्ये या पूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती त्यानंतर संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन १६ जून २०२० मध्ये या महासेतू पूलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं होतं.

या घटनेनंतर आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी ट्विट करुन बिहार सरकारवर टीका केली आहे. ८ वर्षात २६३.४७ कोटी खर्च करुन गोपाळगंजच्या सत्तर घाट पूलाचं बांधकाम केले होते, १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याचे उद्धाटन केले होते. फक्त २९ दिवसांत हा पूल कोसळला आहे. खबरदार, जर कोणी नितीश कुमार यांना भ्रष्टाचारी म्हटलं तर...२६३ कोटी सुशासनाचा दिखावा आहे इतक्या पैशात त्यांचे उंदिर दारू पितात असा टोला तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना लगावला आहे.

तर याबाबत बिहारमधील मंत्री नंदकिशोर यादव म्हणाले की, सत्तरघाट येथे ३ छोटे पूल आहेत, सत्तरघाट ब्रिजपासून २ किमी अंतरावर असणारा छोटा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे तुटला आहे. संपूर्ण सत्तरघाट पूलाचं नुकसान झालं नाही. अशा नैसर्गिक परिस्थितीत रस्ते वाहून जातात, पूल तुटतात अशाप्रकारे वादग्रस्त विधान केले आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारfloodपूर