शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:32 IST

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते.

गोपाळगंज – बिहारमध्ये सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे, एकीकडे पुराचा कहर तर दुसरीकडे कोरोनाची महामारी. ही परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुशासनचा दावा करणाऱ्या नितीश सरकारची पोलखोल गोपाळगंजमधील पूलाचा काही भाग कोसळल्याने उघड झाला आहे. एक महिन्यापूर्वी सत्तरघाट महासेतूचं उद्धाटन करण्यात आलं होतं. यासाठी जवळपास २६४ कोटींचा खर्च झाला होता.

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी, बेतिया याठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हा पूल गोपाळगंजला चंपारणपासून तिरहुतच्या अनेक जिल्ह्यांना जोडतो. गोपाळगंज येथे बुधवारी ३ लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले. अतिवेगात आलेल्या पाण्यामुळे पूलाचा काही भाग कोसळला.

बैकुंठपूरच्या फैजुल्लाहपूर येथे हा पूल तुटला आहे. भाजपा आमदार मिथिलेश तिवारी यांनी या घटनेची माहिती बिहारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री नंदकिशोर यादव यांना दिली आहे. या पूलाचं बांधकाम ब्रीज निर्माण विभागाकडून करण्यात आलं होतं. २०१२ मध्ये या पूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती त्यानंतर संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन १६ जून २०२० मध्ये या महासेतू पूलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं होतं.

या घटनेनंतर आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी ट्विट करुन बिहार सरकारवर टीका केली आहे. ८ वर्षात २६३.४७ कोटी खर्च करुन गोपाळगंजच्या सत्तर घाट पूलाचं बांधकाम केले होते, १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याचे उद्धाटन केले होते. फक्त २९ दिवसांत हा पूल कोसळला आहे. खबरदार, जर कोणी नितीश कुमार यांना भ्रष्टाचारी म्हटलं तर...२६३ कोटी सुशासनाचा दिखावा आहे इतक्या पैशात त्यांचे उंदिर दारू पितात असा टोला तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना लगावला आहे.

तर याबाबत बिहारमधील मंत्री नंदकिशोर यादव म्हणाले की, सत्तरघाट येथे ३ छोटे पूल आहेत, सत्तरघाट ब्रिजपासून २ किमी अंतरावर असणारा छोटा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे तुटला आहे. संपूर्ण सत्तरघाट पूलाचं नुकसान झालं नाही. अशा नैसर्गिक परिस्थितीत रस्ते वाहून जातात, पूल तुटतात अशाप्रकारे वादग्रस्त विधान केले आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारfloodपूर