शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:32 IST

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते.

गोपाळगंज – बिहारमध्ये सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे, एकीकडे पुराचा कहर तर दुसरीकडे कोरोनाची महामारी. ही परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुशासनचा दावा करणाऱ्या नितीश सरकारची पोलखोल गोपाळगंजमधील पूलाचा काही भाग कोसळल्याने उघड झाला आहे. एक महिन्यापूर्वी सत्तरघाट महासेतूचं उद्धाटन करण्यात आलं होतं. यासाठी जवळपास २६४ कोटींचा खर्च झाला होता.

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी, बेतिया याठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हा पूल गोपाळगंजला चंपारणपासून तिरहुतच्या अनेक जिल्ह्यांना जोडतो. गोपाळगंज येथे बुधवारी ३ लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले. अतिवेगात आलेल्या पाण्यामुळे पूलाचा काही भाग कोसळला.

बैकुंठपूरच्या फैजुल्लाहपूर येथे हा पूल तुटला आहे. भाजपा आमदार मिथिलेश तिवारी यांनी या घटनेची माहिती बिहारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री नंदकिशोर यादव यांना दिली आहे. या पूलाचं बांधकाम ब्रीज निर्माण विभागाकडून करण्यात आलं होतं. २०१२ मध्ये या पूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती त्यानंतर संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन १६ जून २०२० मध्ये या महासेतू पूलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं होतं.

या घटनेनंतर आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी ट्विट करुन बिहार सरकारवर टीका केली आहे. ८ वर्षात २६३.४७ कोटी खर्च करुन गोपाळगंजच्या सत्तर घाट पूलाचं बांधकाम केले होते, १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याचे उद्धाटन केले होते. फक्त २९ दिवसांत हा पूल कोसळला आहे. खबरदार, जर कोणी नितीश कुमार यांना भ्रष्टाचारी म्हटलं तर...२६३ कोटी सुशासनाचा दिखावा आहे इतक्या पैशात त्यांचे उंदिर दारू पितात असा टोला तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना लगावला आहे.

तर याबाबत बिहारमधील मंत्री नंदकिशोर यादव म्हणाले की, सत्तरघाट येथे ३ छोटे पूल आहेत, सत्तरघाट ब्रिजपासून २ किमी अंतरावर असणारा छोटा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे तुटला आहे. संपूर्ण सत्तरघाट पूलाचं नुकसान झालं नाही. अशा नैसर्गिक परिस्थितीत रस्ते वाहून जातात, पूल तुटतात अशाप्रकारे वादग्रस्त विधान केले आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारfloodपूर