शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

८ वर्ष बांधकाम अन् २६४ कोटी खर्च करुन फक्त २९ दिवसात कोसळला गोपाळगंजचा महासेतू पूल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:32 IST

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते.

गोपाळगंज – बिहारमध्ये सध्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे, एकीकडे पुराचा कहर तर दुसरीकडे कोरोनाची महामारी. ही परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुशासनचा दावा करणाऱ्या नितीश सरकारची पोलखोल गोपाळगंजमधील पूलाचा काही भाग कोसळल्याने उघड झाला आहे. एक महिन्यापूर्वी सत्तरघाट महासेतूचं उद्धाटन करण्यात आलं होतं. यासाठी जवळपास २६४ कोटींचा खर्च झाला होता.

१६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लालछापर, मुजफ्फरपूर, मोतिहारी, बेतिया याठिकाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. हा पूल गोपाळगंजला चंपारणपासून तिरहुतच्या अनेक जिल्ह्यांना जोडतो. गोपाळगंज येथे बुधवारी ३ लाख क्युसेसने पाणी सोडण्यात आले. अतिवेगात आलेल्या पाण्यामुळे पूलाचा काही भाग कोसळला.

बैकुंठपूरच्या फैजुल्लाहपूर येथे हा पूल तुटला आहे. भाजपा आमदार मिथिलेश तिवारी यांनी या घटनेची माहिती बिहारच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री नंदकिशोर यादव यांना दिली आहे. या पूलाचं बांधकाम ब्रीज निर्माण विभागाकडून करण्यात आलं होतं. २०१२ मध्ये या पूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती त्यानंतर संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन १६ जून २०२० मध्ये या महासेतू पूलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं होतं.

या घटनेनंतर आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी ट्विट करुन बिहार सरकारवर टीका केली आहे. ८ वर्षात २६३.४७ कोटी खर्च करुन गोपाळगंजच्या सत्तर घाट पूलाचं बांधकाम केले होते, १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्याचे उद्धाटन केले होते. फक्त २९ दिवसांत हा पूल कोसळला आहे. खबरदार, जर कोणी नितीश कुमार यांना भ्रष्टाचारी म्हटलं तर...२६३ कोटी सुशासनाचा दिखावा आहे इतक्या पैशात त्यांचे उंदिर दारू पितात असा टोला तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना लगावला आहे.

तर याबाबत बिहारमधील मंत्री नंदकिशोर यादव म्हणाले की, सत्तरघाट येथे ३ छोटे पूल आहेत, सत्तरघाट ब्रिजपासून २ किमी अंतरावर असणारा छोटा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे तुटला आहे. संपूर्ण सत्तरघाट पूलाचं नुकसान झालं नाही. अशा नैसर्गिक परिस्थितीत रस्ते वाहून जातात, पूल तुटतात अशाप्रकारे वादग्रस्त विधान केले आहे.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारfloodपूर