शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

धक्कादायक! २९ दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं; हॉस्पिटलबाहेर येताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:44 IST

या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करण्याऐवजी सिव्हिल सर्जन त्यांना वाचवताना दिसत होते.

कटनी - मध्य प्रदेशातील कटनी जिल्हा रुग्णालयातील SNCU मध्ये नर्सिंग स्टाफचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. २९ दिवसांचे नवजात बालक मृत झाल्याचं सांगून नातेवाइकांना घरी जाण्यास सांगितले.  मात्र हॉस्पिटलबाहेर येताच मुलाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचा संशय कुटुंबाला आल्याने त्यांनी तात्काळ ओपीडीमध्ये जाऊन डॉक्टरांना ही बाब सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता बालकाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचं सांगण्यात आले. 

या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करण्याऐवजी सिव्हिल सर्जन त्यांना वाचवताना दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हरैया गावात राहणारा सोनूपती विष्णू चौधरी विजयराघवगड हिची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. तिला २९ दिवसांचे बाळ होते. बाळ बरे झाल्यावर  महिलेला घरी सोडण्यात आले त्यानंतर आई आणि मूल दोघेही घरी गेले. मात्र घरी आल्यानंतर मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने शुक्रवारी दुपारी त्याला पुन्हा एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले, तेथे उपचार सुरू होते. पण काही वेळाने नर्सिंग स्टाफने सांगितले की, आता तुमच्या मुलाचा श्वास थांबला आहे. त्याला घरी घेऊन जा, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला, आई वडील रडू लागले, मृत मुलाला रुग्णालयातून बाहेर आणत घरी निघाले. 

परंतु काही क्षणात मुलाचा श्वास सुरू असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी ओपीडीमध्ये बसलेल्या डॉक्टरांना ही बाब सांगितली. या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा मुलाच्या हृदयाचे ठोके चालू होते. यानंतर कुटुंबियांनी तात्काळ मुलाला खासगी रुग्णालयात नेले, तेथे मुलावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाबाबत सिव्हिल सर्जन डॉ. यशवंत वर्मा म्हणाले, मुलाचा श्वास बंद झाल्यानं नर्सिंग स्टाफनं हे सांगितले असेल. मात्र कुटुंबियांनी न सांगता मुलाला रुग्णालयातून नेले आहे. हॉस्पिटलमधील प्रत्येक मूल निरोगी असावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो असं डॉक्टरांनी म्हटलं. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून घडलेल्या प्रकारामुळे मुलाच्या आई वडिलांसह नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"