शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

५०० आणि २००० च्या नव्या नोटा अधिक सुरक्षित

By admin | Updated: November 9, 2016 04:49 IST

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने नव्या व अतिशय उच्च सुरक्षिततेच्या ५०० आणि दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटांचे उत्पादन केले असून

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने नव्या व अतिशय उच्च सुरक्षिततेच्या ५०० आणि दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटांचे उत्पादन केले असून त्या चलनातून बाहेर काढून घेण्यात आलेल्या नोटांची जागा घेतील.बनावट भारतीय चलनाचे वाढते प्रमाण व त्याचा वापर दहशतवाद पोसण्यासाठी होत असल्यामुळे रिझर्व्ह बँक आणि सरकार चिंतेत होते. अनेक कायदा राबविणाऱ्या यंत्रणांना काळा पैसा दहशतवाद वाढविण्यासाठी वापर होत असल्याचे समजत होते. त्यामुळे ५०० आणि एक हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा सरकारचा निर्णय काळ््या पैशाच्या संकटाला तोंड देण्यासाठी धाडसी होता. ५०० आणि एक हजार रुपयांची नोट बाद करण्याबरोबरच १० नोव्हेंबर २०१६ पासून रिझर्व्ह बँक नव्या नोटा चलनात आणणार आहे. उर्जित पटेल म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने नव्या व अतिशय उच्च सुरक्षिततेच्या ५०० आणि दोन हजार रुपये मूल्यांच्या नोटांचे उत्पादन केले असून त्या चलनातून बाहेर काढून घेण्यात येणाऱ्या नोटांची जागा घेतील.सध्या ५०० रुपयांच्या १६.५ अब्ज तर एक हजार रुपयांच्या ६.७ अब्ज नोटा चलनात आहेत. सरकारने एका दिवसासाठी एटीएमवरून खात्यातील दोन हजार रुपये तर बँकेत जाऊन जास्तीत-जास्त दहा हजार रुपये तर आठवड्यात २० हजार रुपये काढण्याचे बंधन घातले आहे. पैसे काढण्याची मर्यादा हळुहळु वाढविली जाईल कारण छोट्या मूल्यांच्या चलनाचा साठा बँकांमध्ये आणि एटीएमवर असून नव्या चलनी नोटा चलनात येतील. एक हजार रुपयांची चलनी नोट लवकरच पुन्हा उपलब्ध केली जाईल, असे दास म्हणाले. दोन हजार रुपयांच्या नोटेचा चलनातील समावेशावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल व रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण त्यावर असेल, असेही त्यांनी सांगितले.९ नोव्हेंबरला बँकांना सुटी आहे आणि कोषागारेही बंद असतील. २०११ ते २०१६ दरम्यान ५०० रुपयांच्या नोटा ७६ टक्क्यांनी तर एक हजार रुपयांचे चलन १०९ टक्क्यांनी वाढले परंतु अर्थव्यवस्था केवळ ३० टक्क्यांनी वाढली. बेकायदा चलन बदलून घेण्यासाठी तुमचा वापर होणार नाही, याची काळजी घ्या. तुमचे मित्र आणि कुटुंबातील नातेवाईकांसाठी मात्र हे काम तुम्ही करू शकता. एक हजार रुपयाच्या नोटेसह इतर रकमांच्या नोटाही चलनात आणल्या जातील. हे पाऊस का उचलावे लागले याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात पुरेसा खुलासा केला आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रामाणिकपणासाठी व तुम्हाला अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने वाढ हवी असेल तर ही बनावट अर्थव्यवस्था आधी बंद झाली पाहिजे. (लोकमत न्यूज नेटवर्क)