शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

उमा भारतींवर नवे संकट

By admin | Updated: April 20, 2017 00:54 IST

बाबरी प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली बाबरी प्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर १२ जणांवर गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्याचा खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची घाईघाईने बुधवारी सायंकाळी बैठक झाली. तिला पक्षाध्यक्ष अमित शाह व वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. काश्मीर प्रश्नाशी सरकार झगडत असताना देशातील धार्मिक शांतता आणि सलोखा बिघडू नये, असेच सरकारला वाटत आहे. न्यायालयाच्या निर्णयावर अडवाणी वा जोशी यांनी काहीही भाष्य केलेले नाही. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह हे घटनात्मक पदावर असल्याने न्यायालयाने त्यांच्यावर खटला चालवण्यापासून दूर ठेवले आहे. उमा भारती यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला पंतप्रधान कार्यालयाने दिला आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे : सूरजेवालाबाबरी मशीद जमीनदोस्त झाली त्या प्रकरणातील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केली, ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य ‘नैतिकतेचा उच्च आदर्श’ राखतील आणि राजीनामा देतील, हे बघितले पाहिजे. त्यांचा रोख उमा भारती यांच्याकडे होता. दर्जा, जात, वंश, धर्म किंवा विभाग काहीही असला तरी कायदा हा सगळ््यांसाठी समान आहे, असे सूरजेवाला म्हणाले. पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केले व मोदी यांना त्यांच्याच नैतिकतेच्या घोषणांची आठवण असेल, अशी आशा आहे, असे म्हटले.आरोपपत्र मागे घ्या : खा. राऊ तभाजप नेत्यांवर खटला चालवण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. बाबरीप्रकरणी सरकारने आरोपपत्र मागे घ्यावे आणि मगच राम मंदिर बांधण्याची भाषा करावी, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाबरी मशीद पाडल्याशिवाय राम मंदिर होणे अशक्य होते. शिवसेना व भाजपचा हाच अजेंडा होता. आताही केंदाचा्र तोच अजेंडा असला पाहिजे. बाबरी मशीद पाडणे हा कट मानला जातो आणि याप्रकरणात नेत्यांविरोधात खटला चालवला जातो हा प्रकार दुर्दैवी आहे, असेही संजय राऊत म्हणाले. प्राणार्पणासही तयार : उमा भारती या निकालामुळे आपण अजिबात अस्वस्थ नसून, राम मंदिराच्यासाठी माझे आयुष्यही द्यायला तयार आहे, असे केंद्रीय मंत्री उमा भारती म्हणाल्या. रामजन्मभूमी मोहिमेमध्ये माझी जी भूमिका होती त्याबद्दल मला अभिमान वाटतो, पश्चाताप होत नाही. राम मंदिरासाठी केलेल्या संघर्षाबद्दल मिळेल, त्या शिक्षेला मी तोंड देईन. कट केल्याच्या आरोपांचा भारती यांनी इन्कार केला. कोणताही कट नव्हता. प्रत्येक गोष्ट उघड होती. मी राम मंदिर मोहिमेमध्ये अभिमान आणि आत्मविश्वासाने सहभागी होते. मी ६ डिसेंबर १९९२ रोजी मी मशिदीच्या ठिकाणी उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.