शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

भारत-श्रीलंका यांच्यात नागरी अणुकरार सहकार्याचे नवे पर्व: संयुक्त पत्रपरिषदेत घोषणा

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

नवी दिल्ली : भारत- श्रीलंकेने सोमवारी नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यासह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विस्ताराचा निर्णय घेत द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रपरिषदेत याबाबत घोषणा केली.

नवी दिल्ली : भारत- श्रीलंकेने सोमवारी नागरी अणुकरारावर स्वाक्षरी करण्यासह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विस्ताराचा निर्णय घेत द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी चर्चेनंतर संयुक्त पत्रपरिषदेत याबाबत घोषणा केली.
विधायक आणि मानवतावादी दृष्टिकोन अवलंबत मच्छिमारांच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी कटिबद्धता दर्शविली आहे. श्रीलंकेने प्रथमच अशा करारावर स्वाक्षरी केली आहे. कृषी आणि आरोग्यनिगेसारख्या अन्य क्षेत्रांमध्येही सहकार्याची दारे उघडली जातील, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत महिंदा राजपक्षे यांचा पराभव करीत त्यांची १० वर्षांची राजवट उलथवणारे सिरीसेना अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिलाच विदेशदौरा करताना रविवारी भारतभेटीवर आले.
------------------
काय असेल करारात...
अणुकरारामुळे दोन्ही देशांना ज्ञान आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे आदान-प्रदान करता येईल.
संसाधनांच्या वाटाघाटीसह अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासह क्षमता वाढविण्यालाही हा करार लाभदायक ठरेल. रेडिओस्टोप्सचा वापर, अणुसुरक्षा, किरणोर्त्सग संरक्षण, रेडिओधर्मी टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन, अणू आणि रेडिओधर्मी पदार्थांचा अपघात टाळणे तसेच पर्यावरण संरक्षणासारख्या क्षेत्रातही दोन देशांचे सहकार्याचे नवे पर्व सुरू करतील.
-------------------------
अन्य तीन करारांवर स्वाक्षऱ्या...
कृषी, नालंदा विद्यापीठ प्रकल्पात श्रीलंकेचा सहभाग, तसेच संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य या तीन करारांवरही दोन देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या क्षेत्रात संबंध आणखी विस्तारण्यावर दोन्ही देश सहमत झाले असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. सागरी सुरक्षा सहकार्यातील प्रगतीचे आम्ही स्वागत करतो आहोत. मालदीवच्या सहभागामुळे सहकार्य त्रिस्तरीय असेल. मच्छिमारांच्या मुद्याला सिरीसेना यांनी सवार्ेच्च प्राधान्य दिले आहे कारण दोन्ही देशांच्या मच्छिमार बांधवांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. त्याबाबत मानवतावादी दृष्टिकोन अवलंबला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
---------------------
कोट
दोन देशांची मैत्री केवळ परस्परांनाच नव्हे तर उपखंडासाठी महत्त्वपूर्ण आहे. मोदींनी संबंध सुधारण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांचे मी स्वागत करतो. दोन देशांचे संबंध आणखी बळकट होतील.
- मैत्रीपाला सिरीसेना
श्रीलंकेचे अध्यक्ष
--------------------
सिरीसेना यांनी श्रीलंकाभेटीचे निमंत्रण दिल्याबद्दल मी आभार मानतो. मार्चमध्ये या देशाला भेट देण्यासाठी मी उत्सुक आहे. द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्याची आम्हाला अभूतपूर्व अशी संधी मिळाली आहे. सिरीसेना यांच्या भारतभेटीमुळे आम्ही त्या दिशेने ठोस सुरुवात करू
-नरेंद्र मोदी