शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Narendra Singh Tomar : नवे कृषी कायदे पुन्हा अमलात नाहीत- कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर; आधीच्या भूमिकेपासून घूमजाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 07:23 IST

Narendra Singh Tomar : नव्या कृषी कायद्यांबाबत तोमर यांनी नागपूर येथे नुकतेच एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते.

नवी दिल्ली : नवे कृषी कायदे पुन्हा अमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार नसल्याचे सांगत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आपल्या आधीच्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषी कायदे रद्द केले, असेही ते म्हणाले.नव्या कृषी कायद्यांबाबत तोमर यांनी नागपूर येथे नुकतेच एका कार्यक्रमात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले होते. ते म्हणाले होते की, कृषीक्षेत्रामध्ये मोठी सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तयार केलेले तीन नवे कृषी कायदे काही लोकांना आवडले नाहीत. त्यामुळे हे कायदे रद्द करावे लागले. मात्र त्यामुळे केंद्र सरकार निराश झालेले नाही. आम्ही एक पाऊल मागे गेलो. मात्र आम्ही भविष्यात एक पाऊल पुढे जाऊ. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या कल्याणासाठी योग्य निर्णय घेणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही तोमर म्हणाले होते. 

काँग्रेसकडून जनतेची दिशाभूलनव्या कृषी कायद्यांवरून जे वाद झाले, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मागितलेल्या जाहीर माफीचा तोमर यांनी अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती.  काँग्रेसवर पलटवार करताना नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस लोकांची दिशाभूल करू पाहात आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काँग्रेसने काहीही केलेले नाही. 

टॅग्स :Narendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमर