शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पीएम प्रचंड यांच्या भारत भेटीदरम्यान नेपाळने उचललं मोठं पाऊलं; चीनला बसणार चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:02 IST

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उर्जा, व्यापार आणि कनेक्टिव्हीटी यावर चर्चा झाली. नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येण्याच्या काही तास आधी, नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी नेपाळी लोकांशी विवाह करणार्‍या परदेशी लोकांना राजकीय अधिकार तसेच त्वरित नागरिकत्व देणार्‍या नागरिकत्व कायद्यातील वादग्रस्त दुरुस्तीला संमती दिली आहे. 

Amit Shah in Manipur: मणिपूर हिंसाचार: शांतता समिती स्थापन, CBI चौकशी, बंडखोरांना इशारा; केंद्राच्या 9 मोठ्या घोषणा

नेपाळच्या या कायद्याला चीन नेहमीच विरोध करत आला असून नेपाळच्या या पावलावर चीन नाराज असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत नेपाळी पंतप्रधानांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. नेपाळच्या माजी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी या नागरिकत्व दुरुस्तीला दोनदा संमती देण्यास नकार दिला. चीनच्या प्रभावाखाली त्यांनी ते मंजूर केले नाही, असंही बोललं जात आहे. 

नेपाळी कायद्यातील ही दुरुस्ती नेपाळच्या नागरिकत्व कायद्याला जगातील सर्वात उदारमतवादी कायद्यांपैकी एक बनवते. राष्ट्रपती पौडेल यांनी कायद्याला संमती दिल्याने चीनला त्रास होऊ शकतो. या कायद्यामुळे तिबेटी निर्वासितांच्या कुटुंबीयांना नागरिकत्व आणि मालमत्तेचे अधिकार मिळू शकतात, असा इशारा चीन या कायद्यांबाबत नेपाळला देत आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध 'हिट' झाले आहेत. 'मी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नेपाळच्या दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा मी भारत-नेपाळ संबंधांसाठी HIT (HIT- Highways, Information highways, Transways) फॉर्म्युला दिला होता. आम्ही सांगितले होते की आम्ही दोन्ही देशांमध्ये असे संपर्क प्रस्थापित करू की आमच्या सीमा आमच्यामध्ये अडथळा बनू नयेत. ट्रकऐवजी पाइपलाइनद्वारे तेलाची निर्यात करावी, नद्यांवर धरणे बांधावीत, नेपाळमधून भारतात वीज निर्यात करण्यासाठी सुविधा निर्माण व्हाव्यात. आज नऊ वर्षांनंतर मला सांगायला आनंद होत आहे की आमची भागीदारी खरोखरच हिट ठरली आहे.

" मागील नऊ वर्षात भारत आणि नेपाळने मिळून अनेक क्षेत्रात यश संपादन केले आहे. मी आणि पंतप्रधान प्रचंड यांनी मिळून भविष्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. आम्ही पारगमन कराराचा समावेश केला आहे ज्यामध्ये नेपाळच्या लोकांसाठी नवीन रेल्वे मार्ग तसेच भारताच्या अंतर्देशीय जलमार्गांच्या सुविधेसाठी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच नेपाळच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना भारतीय रेल्वे संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रचंड यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये दीर्घकालीन ऊर्जा करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळ