शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

पीएम प्रचंड यांच्या भारत भेटीदरम्यान नेपाळने उचललं मोठं पाऊलं; चीनला बसणार चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:02 IST

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उर्जा, व्यापार आणि कनेक्टिव्हीटी यावर चर्चा झाली. नेपाळचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येण्याच्या काही तास आधी, नेपाळचे राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांनी नेपाळी लोकांशी विवाह करणार्‍या परदेशी लोकांना राजकीय अधिकार तसेच त्वरित नागरिकत्व देणार्‍या नागरिकत्व कायद्यातील वादग्रस्त दुरुस्तीला संमती दिली आहे. 

Amit Shah in Manipur: मणिपूर हिंसाचार: शांतता समिती स्थापन, CBI चौकशी, बंडखोरांना इशारा; केंद्राच्या 9 मोठ्या घोषणा

नेपाळच्या या कायद्याला चीन नेहमीच विरोध करत आला असून नेपाळच्या या पावलावर चीन नाराज असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत नेपाळी पंतप्रधानांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. डिसेंबर २०२२ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. नेपाळच्या माजी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी या नागरिकत्व दुरुस्तीला दोनदा संमती देण्यास नकार दिला. चीनच्या प्रभावाखाली त्यांनी ते मंजूर केले नाही, असंही बोललं जात आहे. 

नेपाळी कायद्यातील ही दुरुस्ती नेपाळच्या नागरिकत्व कायद्याला जगातील सर्वात उदारमतवादी कायद्यांपैकी एक बनवते. राष्ट्रपती पौडेल यांनी कायद्याला संमती दिल्याने चीनला त्रास होऊ शकतो. या कायद्यामुळे तिबेटी निर्वासितांच्या कुटुंबीयांना नागरिकत्व आणि मालमत्तेचे अधिकार मिळू शकतात, असा इशारा चीन या कायद्यांबाबत नेपाळला देत आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांसोबतच्या संयुक्त पत्रकार बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध 'हिट' झाले आहेत. 'मी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नेपाळच्या दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा मी भारत-नेपाळ संबंधांसाठी HIT (HIT- Highways, Information highways, Transways) फॉर्म्युला दिला होता. आम्ही सांगितले होते की आम्ही दोन्ही देशांमध्ये असे संपर्क प्रस्थापित करू की आमच्या सीमा आमच्यामध्ये अडथळा बनू नयेत. ट्रकऐवजी पाइपलाइनद्वारे तेलाची निर्यात करावी, नद्यांवर धरणे बांधावीत, नेपाळमधून भारतात वीज निर्यात करण्यासाठी सुविधा निर्माण व्हाव्यात. आज नऊ वर्षांनंतर मला सांगायला आनंद होत आहे की आमची भागीदारी खरोखरच हिट ठरली आहे.

" मागील नऊ वर्षात भारत आणि नेपाळने मिळून अनेक क्षेत्रात यश संपादन केले आहे. मी आणि पंतप्रधान प्रचंड यांनी मिळून भविष्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. आम्ही पारगमन कराराचा समावेश केला आहे ज्यामध्ये नेपाळच्या लोकांसाठी नवीन रेल्वे मार्ग तसेच भारताच्या अंतर्देशीय जलमार्गांच्या सुविधेसाठी तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच नेपाळच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना भारतीय रेल्वे संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रचंड यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये दीर्घकालीन ऊर्जा करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळ