शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

ना समलैंगिक, ना अविवाहित...तरीही ग्रामस्थांनी लावून दिलं तरुणांचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 13:58 IST

जेव्हा या दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात येत होतं, सप्तपदी घेतली जात होती तेव्हा त्यांच्या बायका आणि मुलं तिथे उभं राहून सगळं पाहत होते

ठळक मुद्देइंदूरजवळच्या मूसाखेडी गावातील ग्रामस्थांनी पाऊस पडावा यासाठी तरुणांचं लग्न लावून दिलंवरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी समलैंगिक नसतानाही या तरुणांचं लग्न लावून देण्यात आलंलग्न झाल्यानंतर वरातही काढण्यात आली

इंदोर, दि. 4 - इंदोरमध्ये गावक-यांनीच दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात आल्याने सर्वांनाच आश्यर्याचा धक्का बसला. पण तुम्ही समजताय तसं हे तरु गावकरी पुढारलेल्या विचारांचे वैगेरे अजिबात नाहीत, तर हे सर्व अंधश्रद्धेपोटी करण्यात आलं आहे. आतापर्यंत पाऊस पडावा म्हणून बेडूक, गाढवांचं लग्न लग्न लावण्यात आल्याचं अनेकदा पाहिलं आहे. पण जे आजतागायत घडलं नाही ते इंदूरमधील ग्रामस्थांनी केलं आहे. पाऊस पडावा म्हणून त्यांनी चक्क दोन तरुणांचं लग्न लावून दिलं. आता ही अंधश्रद्धा आहे यात काहीच वाद नाही. पण लग्न सुरु असतानाच पाऊस पडू लागल्याने गावक-यांनी मात्र एकच जल्लोष सुरु केला. 

इंदूरजवळच्या मूसाखेडी गावातील ग्रामस्थांनी जेव्हा दोन तरुणांना लग्नाच्या कपड्यांमध्ये पाहिलं तेव्हा सुरुवातीला त्यांनाही आश्चर्य वाटलं. एखाद्या लग्नाला ज्याप्रमाणे नातेवाईक हजेरी लावतात, त्याप्रमाणे या लग्नाही नातेवाईकांची झुंबड उडाली होती. वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी समलैंगिक नसतानाही या तरुणांचं लग्न लावून देण्यात आलं. 

विशेष म्हणजे या लग्नासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न झालं तोपर्यंत ठीक होतं, पण लग्न झाल्यानंतर वरातही काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यांवरुन काढण्यात आलेल्या या वरातीत नातेवाईकांनी बॉलिवूड गाण्यांवर चांगलाच ठेका धरला. हिंदू पुजा-याने हे लग्न लावण्याची जबाबदारी पुर्ण केली. सर्वात आश्चर्याची किंवा हास्यास्पद म्हणा, पण जेव्हा या दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात येत होतं, सप्तपदी घेतली जात होती तेव्हा त्यांच्या बायका आणि मुलं तिथे उभं राहून सगळं पाहत होते. 

कहर म्हणजे लग्न लावून झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस धो-धो कोसळायला लागला. पाऊस पडू लागल्याने गावक-यांनी एकच जल्लोष सुरु केला. पावसामुळे आपल्या या अंधश्रद्धेवर त्यांचा चांगलाच विश्वासही बसला. 

ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केला तो पाऊस आल्यानंतर गावक-यांनी जल्लोष केला आणि आपलं घर गाठलं. यानंतर विविहित जोडपं सखाराम आणि राकेश यांनीही आपल्या पत्नी आणि मुलांसोबत घऱचा रस्ता धरला.