शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

ना समलैंगिक, ना अविवाहित...तरीही ग्रामस्थांनी लावून दिलं तरुणांचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 13:58 IST

जेव्हा या दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात येत होतं, सप्तपदी घेतली जात होती तेव्हा त्यांच्या बायका आणि मुलं तिथे उभं राहून सगळं पाहत होते

ठळक मुद्देइंदूरजवळच्या मूसाखेडी गावातील ग्रामस्थांनी पाऊस पडावा यासाठी तरुणांचं लग्न लावून दिलंवरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी समलैंगिक नसतानाही या तरुणांचं लग्न लावून देण्यात आलंलग्न झाल्यानंतर वरातही काढण्यात आली

इंदोर, दि. 4 - इंदोरमध्ये गावक-यांनीच दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात आल्याने सर्वांनाच आश्यर्याचा धक्का बसला. पण तुम्ही समजताय तसं हे तरु गावकरी पुढारलेल्या विचारांचे वैगेरे अजिबात नाहीत, तर हे सर्व अंधश्रद्धेपोटी करण्यात आलं आहे. आतापर्यंत पाऊस पडावा म्हणून बेडूक, गाढवांचं लग्न लग्न लावण्यात आल्याचं अनेकदा पाहिलं आहे. पण जे आजतागायत घडलं नाही ते इंदूरमधील ग्रामस्थांनी केलं आहे. पाऊस पडावा म्हणून त्यांनी चक्क दोन तरुणांचं लग्न लावून दिलं. आता ही अंधश्रद्धा आहे यात काहीच वाद नाही. पण लग्न सुरु असतानाच पाऊस पडू लागल्याने गावक-यांनी मात्र एकच जल्लोष सुरु केला. 

इंदूरजवळच्या मूसाखेडी गावातील ग्रामस्थांनी जेव्हा दोन तरुणांना लग्नाच्या कपड्यांमध्ये पाहिलं तेव्हा सुरुवातीला त्यांनाही आश्चर्य वाटलं. एखाद्या लग्नाला ज्याप्रमाणे नातेवाईक हजेरी लावतात, त्याप्रमाणे या लग्नाही नातेवाईकांची झुंबड उडाली होती. वरुणदेवाला प्रसन्न करण्यासाठी समलैंगिक नसतानाही या तरुणांचं लग्न लावून देण्यात आलं. 

विशेष म्हणजे या लग्नासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न झालं तोपर्यंत ठीक होतं, पण लग्न झाल्यानंतर वरातही काढण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यांवरुन काढण्यात आलेल्या या वरातीत नातेवाईकांनी बॉलिवूड गाण्यांवर चांगलाच ठेका धरला. हिंदू पुजा-याने हे लग्न लावण्याची जबाबदारी पुर्ण केली. सर्वात आश्चर्याची किंवा हास्यास्पद म्हणा, पण जेव्हा या दोन तरुणांचं लग्न लावून देण्यात येत होतं, सप्तपदी घेतली जात होती तेव्हा त्यांच्या बायका आणि मुलं तिथे उभं राहून सगळं पाहत होते. 

कहर म्हणजे लग्न लावून झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस धो-धो कोसळायला लागला. पाऊस पडू लागल्याने गावक-यांनी एकच जल्लोष सुरु केला. पावसामुळे आपल्या या अंधश्रद्धेवर त्यांचा चांगलाच विश्वासही बसला. 

ज्याच्यासाठी हा सगळा खटाटोप केला तो पाऊस आल्यानंतर गावक-यांनी जल्लोष केला आणि आपलं घर गाठलं. यानंतर विविहित जोडपं सखाराम आणि राकेश यांनीही आपल्या पत्नी आणि मुलांसोबत घऱचा रस्ता धरला.