शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

नेहरूंचे द्रष्टेपण जगाला मान्य, धर्मनिरपेक्षता काळाची गरज

By admin | Updated: November 18, 2014 00:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़ याच अनुषंगाने जगभरातील दिग्गज आणि बिगर भाजपा व बिगर रालोआ पक्षांना काँग्रेसने सोमवारी नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात एकत्र आणले़ नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले़आपल्या भाषणात सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवरही थेट हल्ला चढवला़ अलीकडे तथ्यांचा विपर्यास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ सत्य दडवून आणि असत्याची कास धरून नेहरूंची विचारधारा डावलली जात आहे; पण नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ भारताला स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ मानवी स्वातंत्र्य आहे, हा नेहरूंचा विचार होता़ त्यांच्या याच विचारधारेने नेल्सन मंडेला आणि आँग सान सू की यांनाही प्रेरित केले, असे सोनिया म्हणाल्या़भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा संसदीय लोकशाहीवर अतूट विश्वास होता, हे सांगताना सोनियांनी १९५१ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा दाखला दिला़ त्या म्हणाल्या, पंडितजी नेहमी सांगत की, जिंकलेल्यांनी विजयाची हवा कानात शिरू देऊ नये आणि हरलेल्यांनी निराश होता कामा नये़ जय-पराजयाची पद्धत ही निवडणूक निकालांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे़ चुकीच्या पद्धतीने जिंकण्यापेक्षा योग्य पद्धतीने हरणे कधीही चांगले. नेहरूंसाठी धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्मांचा आदर हा श्रद्धेचा प्रश्न होता़ धर्मनिरपेक्षतेशिवाय कुठलाही भारतीय, कुठलाही भारत असू शकत नाही़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज आहे़ विविध जातीपंथ असलेल्या, विविध भाषा आणि संस्कृती अशा वैविध्याने नटलेल्या देशाला केवळ संसदीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकारच एकसंघ ठेवू शकते, हे नेहरूंचे विचार काळाच्या कसोटीवर खरे ठरत आहेत़माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस प्रतिनिधी मंडळाचे नेते उद्या मंगळवारी भाषण करतील आणि याचसोबत या संमेलनाची सांगता होईल़