शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Apple Awe Dropping Event : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
3
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
6
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
7
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
8
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
9
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
10
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
11
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
12
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
13
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
14
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
15
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
16
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
17
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
18
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
19
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
20
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

नेहरूंचे द्रष्टेपण जगाला मान्य, धर्मनिरपेक्षता काळाची गरज

By admin | Updated: November 18, 2014 00:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’च्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहरू आणि त्यांचा वारसा याला शस्त्र बनवत काँग्रेसही मैदानात उतरली आहे़ याच अनुषंगाने जगभरातील दिग्गज आणि बिगर भाजपा व बिगर रालोआ पक्षांना काँग्रेसने सोमवारी नेहरूंच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात एकत्र आणले़ नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशासाठी धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले़आपल्या भाषणात सोनियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवरही थेट हल्ला चढवला़ अलीकडे तथ्यांचा विपर्यास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ सत्य दडवून आणि असत्याची कास धरून नेहरूंची विचारधारा डावलली जात आहे; पण नेहरूंचे विचार आजही प्रासंगिक आहेत़ भारताला स्वातंत्र्य मिळणे पुरेसे नाही तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ मानवी स्वातंत्र्य आहे, हा नेहरूंचा विचार होता़ त्यांच्या याच विचारधारेने नेल्सन मंडेला आणि आँग सान सू की यांनाही प्रेरित केले, असे सोनिया म्हणाल्या़भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा संसदीय लोकशाहीवर अतूट विश्वास होता, हे सांगताना सोनियांनी १९५१ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा दाखला दिला़ त्या म्हणाल्या, पंडितजी नेहमी सांगत की, जिंकलेल्यांनी विजयाची हवा कानात शिरू देऊ नये आणि हरलेल्यांनी निराश होता कामा नये़ जय-पराजयाची पद्धत ही निवडणूक निकालांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे़ चुकीच्या पद्धतीने जिंकण्यापेक्षा योग्य पद्धतीने हरणे कधीही चांगले. नेहरूंसाठी धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्मांचा आदर हा श्रद्धेचा प्रश्न होता़ धर्मनिरपेक्षतेशिवाय कुठलाही भारतीय, कुठलाही भारत असू शकत नाही़ भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात धर्मनिरपेक्षता ही काळाची गरज आहे़ विविध जातीपंथ असलेल्या, विविध भाषा आणि संस्कृती अशा वैविध्याने नटलेल्या देशाला केवळ संसदीय लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष सरकारच एकसंघ ठेवू शकते, हे नेहरूंचे विचार काळाच्या कसोटीवर खरे ठरत आहेत़माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस प्रतिनिधी मंडळाचे नेते उद्या मंगळवारी भाषण करतील आणि याचसोबत या संमेलनाची सांगता होईल़