शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदी, राफेल घोटाळ्यावरही मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 05:14 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेब्रुवारीच्या ‘मन की बात’ मध्ये नीरव मोदीची २२ हजार कोटींची लूट व ५८ हजार कोटींचा राफेल घोटाळा या विषयांवर बोलावे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुचवले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फेब्रुवारीच्या ‘मन की बात’ मध्ये नीरव मोदीची २२ हजार कोटींची लूट व ५८ हजार कोटींचा राफेल घोटाळा या विषयांवर बोलावे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुचवले आहे. या विषयांवरील आपले प्रवचन ऐकण्यास मी उत्सुक आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.गेल्या महिन्यात मी केलेल्या सूचनांकडे आपण दुर्लक्ष केले. प्रत्येक भारतीयाला आज तुम्ही ज्यावर बोलावे, असे वाटते तो विषय तुम्हाला ठाऊक असताना लोकांकडून सूचना मागवण्याची गरजच काय?, असे राहुल यांनी म्हटले आहे.मोदी व चोकसी यांचा घोटाळा उघडकीस आला आहे. २०११ पासून चुकीच्या पद्धतीने बँकेचे व्यवहार करून, काही जणांशी संगनमताने बँकिंग प्रणालीमध्ये छेडछाड करून बँकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. राहुल यांनी या घोटाळ््यात वरिष्ठ अधिकाºयांचा हात असल्याचा आरोप करून, याविषयी पंतप्रधानांनी धारण केलेल्या मौनाबाबत सवाल केला आहे.रविवारीही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमावर टीका केली. ते म्हणाले की, मोदींकडे विद्यार्थ्यांसाठी दोन तास आहेत, परंतु बँक घोटाळ््यावर बोलण्यासाठी दोन मिनिटेही नाहीत. आपणच अपराध केला आहे, असे वागणे बंद करा, अशीही सूचना गांधी यांनी केली आहे.जानेवारीमध्ये मोदी यांना ‘मन की बात’साठी राहुल यांनी बेरोजगारी, चीनची घुसखोरी व हरियाणातील बलात्कार हे विषय सुचवले होते. राहुल गांधी यांनी टष्ट्वीटरवर उपस्थित केलेल्या मुद्द्यांना लाखो नेटिझन्सनी पाठिंबा दिसत आहे.राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की, पंतप्रधानांनी नोटबंदीसारखे निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांनी जनतेला पैसे बँकेत जमा करायला भाग पाडले आणि आता त्यांचे मित्र व हितसंबंधी बँकामध्ये जमा केलेल्या पैशावर डल्ला मारत आहेत. मोदी यावर काहीच बोलत नाहीत!

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी