शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

अवघ्या आफ्रिकेला लागते, तितकी वीज तुमचा एसी फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 09:55 IST

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमानवाढ तसेच वाढती गरज लक्षात घेता देशात घरगुती वातानुकूलित यंत्राचा (एसी) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०५० पर्यंत देशात एसीसाठी लागणारी विजेची मागणी नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर ही गरज आजच्या संपूर्ण आफ्रिकेतील एकूण विजेच्या वापरापेक्षा जास्त असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) मंगळवारी सांगितले.

आयईएने सांगितले की, गेल्या पाच दशकांमध्ये भारताने ७००हून अधिक उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत, ज्यात १७,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे भारतातील एसीची मागणी वाढत्या उत्पन्नासह सातत्याने वाढत आहे. २०१० पासून तिप्पट वाढून प्रति १०० कुटुंबांमागे २४ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. घरगुती एसीची मागणी २०५० पर्यंत नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे, असे म्हटले आहे.

२०५० पर्यंत दरडोई उत्पन्न तिप्पट होणार

भारतातील प्रदूषणरहित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक २०२२ मध्ये सुमारे ६० अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत दुप्पट होईल. निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या दशकाच्या अखेरीस गुंतवणूक जवळजवळ तिप्पट होण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येची वाढ मंदावली असली, तरी २०५० पर्यंत शहरी लोकसंख्या ७४ टक्क्यांनी आणि दरडोई उत्पन्न तिप्पट वाढेल.

भारताची ऊर्जेची गरज

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

 

टॅग्स :electricityवीज