शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
3
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
4
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
5
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
6
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
7
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
8
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
9
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
10
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
11
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
12
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दीपक केसरकरांची सारवासारव
13
प्रेयसीचा शो पाहण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे सरकारी विमान वापरलं; काश पटेल वादाच्या भोवऱ्यात
14
कंडोम बनवणाऱ्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; 2 महिन्यातच दिला बंपर परतावा!
15
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
16
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
17
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
18
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
19
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
20
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?

अवघ्या आफ्रिकेला लागते, तितकी वीज तुमचा एसी फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 09:55 IST

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमानवाढ तसेच वाढती गरज लक्षात घेता देशात घरगुती वातानुकूलित यंत्राचा (एसी) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०५० पर्यंत देशात एसीसाठी लागणारी विजेची मागणी नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर ही गरज आजच्या संपूर्ण आफ्रिकेतील एकूण विजेच्या वापरापेक्षा जास्त असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) मंगळवारी सांगितले.

आयईएने सांगितले की, गेल्या पाच दशकांमध्ये भारताने ७००हून अधिक उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत, ज्यात १७,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे भारतातील एसीची मागणी वाढत्या उत्पन्नासह सातत्याने वाढत आहे. २०१० पासून तिप्पट वाढून प्रति १०० कुटुंबांमागे २४ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. घरगुती एसीची मागणी २०५० पर्यंत नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे, असे म्हटले आहे.

२०५० पर्यंत दरडोई उत्पन्न तिप्पट होणार

भारतातील प्रदूषणरहित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक २०२२ मध्ये सुमारे ६० अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत दुप्पट होईल. निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या दशकाच्या अखेरीस गुंतवणूक जवळजवळ तिप्पट होण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येची वाढ मंदावली असली, तरी २०५० पर्यंत शहरी लोकसंख्या ७४ टक्क्यांनी आणि दरडोई उत्पन्न तिप्पट वाढेल.

भारताची ऊर्जेची गरज

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

 

टॅग्स :electricityवीज