शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अवघ्या आफ्रिकेला लागते, तितकी वीज तुमचा एसी फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 09:55 IST

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमानवाढ तसेच वाढती गरज लक्षात घेता देशात घरगुती वातानुकूलित यंत्राचा (एसी) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०५० पर्यंत देशात एसीसाठी लागणारी विजेची मागणी नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर ही गरज आजच्या संपूर्ण आफ्रिकेतील एकूण विजेच्या वापरापेक्षा जास्त असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) मंगळवारी सांगितले.

आयईएने सांगितले की, गेल्या पाच दशकांमध्ये भारताने ७००हून अधिक उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत, ज्यात १७,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे भारतातील एसीची मागणी वाढत्या उत्पन्नासह सातत्याने वाढत आहे. २०१० पासून तिप्पट वाढून प्रति १०० कुटुंबांमागे २४ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. घरगुती एसीची मागणी २०५० पर्यंत नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे, असे म्हटले आहे.

२०५० पर्यंत दरडोई उत्पन्न तिप्पट होणार

भारतातील प्रदूषणरहित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक २०२२ मध्ये सुमारे ६० अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत दुप्पट होईल. निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या दशकाच्या अखेरीस गुंतवणूक जवळजवळ तिप्पट होण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येची वाढ मंदावली असली, तरी २०५० पर्यंत शहरी लोकसंख्या ७४ टक्क्यांनी आणि दरडोई उत्पन्न तिप्पट वाढेल.

भारताची ऊर्जेची गरज

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

 

टॅग्स :electricityवीज