शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

अवघ्या आफ्रिकेला लागते, तितकी वीज तुमचा एसी फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 09:55 IST

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमानवाढ तसेच वाढती गरज लक्षात घेता देशात घरगुती वातानुकूलित यंत्राचा (एसी) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०५० पर्यंत देशात एसीसाठी लागणारी विजेची मागणी नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे. एवढेच नव्हे, तर ही गरज आजच्या संपूर्ण आफ्रिकेतील एकूण विजेच्या वापरापेक्षा जास्त असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) मंगळवारी सांगितले.

आयईएने सांगितले की, गेल्या पाच दशकांमध्ये भारताने ७००हून अधिक उष्णतेच्या लाटा अनुभवल्या आहेत, ज्यात १७,०००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय परिस्थितीमुळे भारतातील एसीची मागणी वाढत्या उत्पन्नासह सातत्याने वाढत आहे. २०१० पासून तिप्पट वाढून प्रति १०० कुटुंबांमागे २४ युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. घरगुती एसीची मागणी २०५० पर्यंत नऊ पटीने वाढण्याचा अंदाज आहे, असे म्हटले आहे.

२०५० पर्यंत दरडोई उत्पन्न तिप्पट होणार

भारतातील प्रदूषणरहित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक २०२२ मध्ये सुमारे ६० अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत दुप्पट होईल. निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या दशकाच्या अखेरीस गुंतवणूक जवळजवळ तिप्पट होण्याची आवश्यकता आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येची वाढ मंदावली असली, तरी २०५० पर्यंत शहरी लोकसंख्या ७४ टक्क्यांनी आणि दरडोई उत्पन्न तिप्पट वाढेल.

भारताची ऊर्जेची गरज

पुढील तीन दशकांत भारतात जगातील कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशापेक्षा सर्वात जास्त ऊर्जा मागणी वाढेल.

 

टॅग्स :electricityवीज