कामकाजामध्ये पारदर्शकता हवी! (आमच्या अपेक्षा)
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशातून पालिकेचे कामकाज होते. जनतेच्या पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. गरज असेल तीच कामे केली पाहिजेत. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी अनावश्यक कामे करू नयेत. वाशीमध्ये एका उद्यानास भव्य स्वागत कमान तयार केली आहे. वास्तविक त्या ठिकाणी कमानीवर खर्च करण्याची आवश्यकता नव्हती.
कामकाजामध्ये पारदर्शकता हवी! (आमच्या अपेक्षा)
नागरिकांनी कररूपाने दिलेल्या पैशातून पालिकेचे कामकाज होते. जनतेच्या पैशाचा योग्य उपयोग झाला पाहिजे. गरज असेल तीच कामे केली पाहिजेत. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी अनावश्यक कामे करू नयेत. वाशीमध्ये एका उद्यानास भव्य स्वागत कमान तयार केली आहे. वास्तविक त्या ठिकाणी कमानीवर खर्च करण्याची आवश्यकता नव्हती. जुन्या वास्तूंची डागडुजी करायचे सोडून त्या तोडून नवीन इमारती बांधल्या जातात. वाशीमध्ये नाल्यावर पाच कोटींपेक्षा जास्त खर्च करून वाहनतळ उभारण्यात आला आहे. परंतु, त्या ठिकाणे वाहने पार्क केली जात नाहीत. सर्व खर्च व्यर्थ गेला आहे. शहरात अद्याप पार्किंग पॉलिसी बनविण्यात आलेली नाही. ती लवकर तयार झाली पाहिजे. पदपथ चालण्यासारखे राहलेले नाहीत त्यामुळे पादचार्यांना नाइलाजाने रस्त्यावरून चालावे लागतेे. महापालिकेचे पैसे विनाकारण वाया घालविले जात आहेत. नागरिकांमध्ये जागरूकता वाढविली पाहिजे. विकासकामांमध्ये पारदर्शकता असली पाहिजे. नागरिकांना आवश्यक त्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. - संदीप ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते ..........फोटो१३संदीप ठाकूर